शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ ३४ टक्के

By admin | Updated: March 3, 2016 02:25 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘एनपीए’चा (नॉन परफॉर्मिंग असेट) आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

संभाव्य बुडीत कर्ज ?: तब्बल २० टक्के वाढ, वसुली होत नसल्याचा परिणामयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘एनपीए’चा (नॉन परफॉर्मिंग असेट) आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात बहुतांश पीककर्जाची रक्कम आहे. परंतु बिगर शेती कर्जाचीही गेल्या पाच-दहा वर्षांपासून वसुली न झाल्याने ‘एनपीए’चा हा आकडा वाढला आहे.बँकांसाठी पाच टक्के हे ‘एनपीए’चे आदर्श प्रमाण आहे. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ‘एनपीए’ म्हणजे संभाव्य बुडीत कर्ज असले तरी बँका तांत्रिक शब्दांचा खेळ करून ही बाब कधीच मान्य करीत नाही. वाढता ‘एनपीए’ हा बँकांसाठी धोक्याची घंटा असतो. मात्र सहकारातील बँकांमध्ये या ‘एनपीए’ नियंत्रणासाठी राजकीयस्तरावरून पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्यापैकीच एक आहे. या बँकेचे खेळते भांडवल अडीच हजार कोटींचे आहे. या बँकेचा ‘एनपीए’ पूर्वी १४ टक्के होता. ‘एनपीए’च्या आदर्श प्रमाणाच्या तुलनेत आधीच तो नऊ टक्के अधिक होता. परंतु गेल्या काही वर्षात ‘एनपीए’चा हा आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या ३४ टक्क्यांमध्ये सुमारे २८ टक्के ‘एनपीए’ हा केवळ शेती कर्जाचा आहे. अर्थात गेल्या चार-पाच वर्षात सततच्या नापिकीमुळे पीककर्जाची सक्तीने वसुली करता आली नाही. पर्यायाने कर्ज थकले आणि ‘एनपीए’ वाढत गेला. पीककर्जासाठी २३ महिने, तर बिगर शेती कर्जासाठी ९० दिवस ही ‘एनपीए’ची मर्यादा आहे. या काळात कर्जाची वसुली न झाल्यास ती रक्कम ‘एनपीए’ म्हणून गणली जाते. शासनाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांकडील वसुली होऊ शकली नाही. म्हणून ‘एनपीए’ वाढल्याचे बँक सांगत आहे. मात्र बँकेने बिगर शेती कर्जाचा ‘एनपीए’ कमी करण्यासाठीही प्रयत्न केलेले नाहीत. एकीकडे ९० दिवसात वसुली करण्याचे बंधन आहे, तर दुसरीकडे पाच ते दहा वर्षांपासून बिगर शेती कर्जाची वसुली केली गेली नाही. या वसुलीसाठी सक्तीच्या उपाययोजनाही राबविल्या गेल्या नाही. कर्ज थकविणाऱ्यांमध्ये अनेक जण बँकेतील काही संचालकांचे हितसंबंधी असल्याचेही सांगितले जाते. संचालकांच्या शिफारशीवरून त्यांना बिगर शेती कर्ज दिले गेले. मात्र ते थकीत झाले. त्याच्या वसुलीसाठी संचालकांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट वसुली पथकाने तसा प्रयत्न केल्यास त्यालाही थांबविले जात असल्याचा काहींचा अनुभव आहे. यावरून संचालक मंडळाला वाढत्या ‘एनपीए’चे काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. वाढत्या ‘एनपीए’वर बँकेकडून प्रत्येकवेळी आता जप्तीची कारवाई करणार, असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात ती होत नाही. बिगर शेती कर्ज प्रकरणांवरून ही बाब दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)१५ ते २० कोटी बुडण्याची भीती३४ टक्के ‘एनपीए’ असला तरी ती रक्कम वसूल केली जाईल, असा दावा बँकेकडून केला जात आहे. त्याचवेळी बँकेची १५ ते २० कोटी रुपयांची रक्कम बुडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या रकमेच्या वसुलीसाठी आता तारणाची जप्ती व लिलाव, हमीदारांकडून वसुली यासारख्या उपाययोजना केल्या जातील. त्यात नेमकी किती रक्कम वसुल होईल, हे आज तरी कुणालाही सांगणे शक्य नाही. बँकेचा ‘एनपीए’ वाढलेला दिसत असला तरी त्यातील बहुतांश प्रमाण हे पीककर्जाचे आहे. शासनाच्या परिपत्रकामुळे ते वसूल होवू शकले नाही. त्यामुळेच पीककर्जाचा ‘एनपीए’ बँकेच्या सरसकट ‘एनपीए’मध्ये ग्राह्य धरू नये, त्यात सवलत देण्यात यावी, अशी विनंती शासनाला केली जाणार आहे. शेती कर्ज बुडीत नाही, सातबारा गहाण आहे. त्यावर बोजा चढविला आहे. बिगर शेती कर्जाच्या वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू आहे. शेती कर्जामुळेच ‘एनपीए’चा आकडा (३४ टक्के) वाढलेला दिसतो. तो आता कमी होईल.- प्रदीप वादाफळे, प्रभारी सीईओ, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ