शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ ३४ टक्के

By admin | Updated: March 3, 2016 02:25 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘एनपीए’चा (नॉन परफॉर्मिंग असेट) आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

संभाव्य बुडीत कर्ज ?: तब्बल २० टक्के वाढ, वसुली होत नसल्याचा परिणामयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘एनपीए’चा (नॉन परफॉर्मिंग असेट) आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात बहुतांश पीककर्जाची रक्कम आहे. परंतु बिगर शेती कर्जाचीही गेल्या पाच-दहा वर्षांपासून वसुली न झाल्याने ‘एनपीए’चा हा आकडा वाढला आहे.बँकांसाठी पाच टक्के हे ‘एनपीए’चे आदर्श प्रमाण आहे. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ‘एनपीए’ म्हणजे संभाव्य बुडीत कर्ज असले तरी बँका तांत्रिक शब्दांचा खेळ करून ही बाब कधीच मान्य करीत नाही. वाढता ‘एनपीए’ हा बँकांसाठी धोक्याची घंटा असतो. मात्र सहकारातील बँकांमध्ये या ‘एनपीए’ नियंत्रणासाठी राजकीयस्तरावरून पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्यापैकीच एक आहे. या बँकेचे खेळते भांडवल अडीच हजार कोटींचे आहे. या बँकेचा ‘एनपीए’ पूर्वी १४ टक्के होता. ‘एनपीए’च्या आदर्श प्रमाणाच्या तुलनेत आधीच तो नऊ टक्के अधिक होता. परंतु गेल्या काही वर्षात ‘एनपीए’चा हा आकडा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या ३४ टक्क्यांमध्ये सुमारे २८ टक्के ‘एनपीए’ हा केवळ शेती कर्जाचा आहे. अर्थात गेल्या चार-पाच वर्षात सततच्या नापिकीमुळे पीककर्जाची सक्तीने वसुली करता आली नाही. पर्यायाने कर्ज थकले आणि ‘एनपीए’ वाढत गेला. पीककर्जासाठी २३ महिने, तर बिगर शेती कर्जासाठी ९० दिवस ही ‘एनपीए’ची मर्यादा आहे. या काळात कर्जाची वसुली न झाल्यास ती रक्कम ‘एनपीए’ म्हणून गणली जाते. शासनाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांकडील वसुली होऊ शकली नाही. म्हणून ‘एनपीए’ वाढल्याचे बँक सांगत आहे. मात्र बँकेने बिगर शेती कर्जाचा ‘एनपीए’ कमी करण्यासाठीही प्रयत्न केलेले नाहीत. एकीकडे ९० दिवसात वसुली करण्याचे बंधन आहे, तर दुसरीकडे पाच ते दहा वर्षांपासून बिगर शेती कर्जाची वसुली केली गेली नाही. या वसुलीसाठी सक्तीच्या उपाययोजनाही राबविल्या गेल्या नाही. कर्ज थकविणाऱ्यांमध्ये अनेक जण बँकेतील काही संचालकांचे हितसंबंधी असल्याचेही सांगितले जाते. संचालकांच्या शिफारशीवरून त्यांना बिगर शेती कर्ज दिले गेले. मात्र ते थकीत झाले. त्याच्या वसुलीसाठी संचालकांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट वसुली पथकाने तसा प्रयत्न केल्यास त्यालाही थांबविले जात असल्याचा काहींचा अनुभव आहे. यावरून संचालक मंडळाला वाढत्या ‘एनपीए’चे काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. वाढत्या ‘एनपीए’वर बँकेकडून प्रत्येकवेळी आता जप्तीची कारवाई करणार, असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात ती होत नाही. बिगर शेती कर्ज प्रकरणांवरून ही बाब दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)१५ ते २० कोटी बुडण्याची भीती३४ टक्के ‘एनपीए’ असला तरी ती रक्कम वसूल केली जाईल, असा दावा बँकेकडून केला जात आहे. त्याचवेळी बँकेची १५ ते २० कोटी रुपयांची रक्कम बुडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या रकमेच्या वसुलीसाठी आता तारणाची जप्ती व लिलाव, हमीदारांकडून वसुली यासारख्या उपाययोजना केल्या जातील. त्यात नेमकी किती रक्कम वसुल होईल, हे आज तरी कुणालाही सांगणे शक्य नाही. बँकेचा ‘एनपीए’ वाढलेला दिसत असला तरी त्यातील बहुतांश प्रमाण हे पीककर्जाचे आहे. शासनाच्या परिपत्रकामुळे ते वसूल होवू शकले नाही. त्यामुळेच पीककर्जाचा ‘एनपीए’ बँकेच्या सरसकट ‘एनपीए’मध्ये ग्राह्य धरू नये, त्यात सवलत देण्यात यावी, अशी विनंती शासनाला केली जाणार आहे. शेती कर्ज बुडीत नाही, सातबारा गहाण आहे. त्यावर बोजा चढविला आहे. बिगर शेती कर्जाच्या वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू आहे. शेती कर्जामुळेच ‘एनपीए’चा आकडा (३४ टक्के) वाढलेला दिसतो. तो आता कमी होईल.- प्रदीप वादाफळे, प्रभारी सीईओ, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ