शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

१२ आमदारांचा जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:03 IST

जिल्ह्यात मंत्री, खासदार व आमदारांची प्रचंड फौज निर्माण झाली आहे. या सर्व नेते मंडळींपुढे आता जिल्ह्यात विकासगंगा खेचून आणण्याचे आव्हान आहे.

ठळक मुद्देविकासगंगा खेचून आणण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मंत्री, खासदार व आमदारांची प्रचंड फौज निर्माण झाली आहे. या सर्व नेते मंडळींपुढे आता जिल्ह्यात विकासगंगा खेचून आणण्याचे आव्हान आहे.यवतमाळ हा आता नागपूरच्या बरोबरीने १२ आमदारांचा जिल्हा बनला आहे. सात विधानसभेचे तर पाच विधान परिषदेचे आमदार आहेत. १२ पैकी आठ आमदार हे सत्ताधारी भाजपा (सहा) व शिवसेनेचे (दोन) आहेत. याशिवाय अमरावती विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे दोन स्वतंत्र आमदार वेगळेच. या आमदारांपैकी दोघांकडे राज्यमंत्री पद आणि त्यातही वजनदार खाते आहेत. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मिशनचे अध्यक्षपद जिल्ह्याकडे आहे. विधीमंडळाच्या अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद जिल्ह्यात आहे. जिल्ह्याला तीन खासदार लाभले आहेत. त्यातील एकाकडे केंद्रीय राज्यमंत्री पद आहे. तीन पैकी दोघे सत्ताधारी तर एक विरोधी बाकावरील पण सातत्याने दिल्लीत कनेक्ट राहणारे आहेत.जिल्ह्यात राजकीय नेत्यांची एवढी प्रचंड मोठी फौज असल्याने जनतेने सहाजिकच भरीव विकासाची अपेक्षा करणे गैर नाही. परंतु गेल्या साडेतीन चार वर्षात या राजकीय फौजेला जिल्ह्यासाठी फार काही करता आलेले नाही. जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम देऊ शकेल, असा एकही मोठा उद्योग या नेते मंडळींना खेचून आणता आलेला नाही. एमआयडीसीतील शेकडो भूखंड उद्योगाच्या प्रतीक्षेत आहेत. नोटाबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने अनेक उद्योग अखेरच्या घटका मोजत आहेत. गाजावाजा करून आणलेला टेक्सटाईल झोनही पडून आहे. रेल्वे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पासह यवतमाळ-मूर्तीजापूर या ब्रॉडग्रेज रेल्वे मार्गाच्या आढाव्यासंंबंधी सातत्याने सचित्र बातम्या येत असतात, एवढीच काय ती या मार्गाची गेल्या अनेक वर्षातील उपलब्धी सांगता येईल.भाजपा सरकारची चार वर्षे निघून गेली आहेत. या काळात सत्तेत असलेल्यांना जिल्ह्यासाठी फार काही आणता आलेले नाही. किमान आता उरलेल्या वर्षभरात तरी या मंडळींना जिल्ह्याच्या विकासात काही हातभार लावता येतो का याकडे नजरा लागल्या आहेत. त्यात अपयश आल्यास आगामी निवडणुकांमध्ये या नेत्यांचा मतदारांकडून संधी मिळेल तेव्हा ‘हिशेब’ केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात भाजपा सरकारने विविध योजना आणल्या. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या योजनांना ग्रहणच लागले. आता तरी लोकप्रतिनिधींनी जागरुक राहून प्रशासनाला वठणीवर आणावे व सरकारच्या चांगल्या योजना तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून त्याची कोटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, एवढीच काय ती रास्त अपेक्षा सामान्य जनतेची आहे.विमानतळ विकासाकडे दुर्लक्षसत्तेची चार वर्ष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांना साधा येथील विमानतळ विकासाचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या विकासासाठी अनेक बैठका झाल्या. पण त्यासाठी कुण्या लोकप्रतिनिधीने आग्रही भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच आजही विमान वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही.