शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

यवतमाळ शहराला दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: January 13, 2016 02:58 IST

शहराला होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आली आहे.

प्रयोगशाळेचा अहवाल : नगरपरिषदेचे बोट प्राधिकरणाकडेसुरेंद्र राऊत यवतमाळ शहराला होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यापैकी १७ टक्के नमुने दूषित आढळून आले आहे. यामुळे यवतमाळ शहरातील सव्वालाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवित जबाबदारी झटकली आहे.यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल आरोग्य प्रयोगशाळेने आरोग्य सेवा संचालनालयाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे १० टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित निघाल्यास ते मानवी आरोग्यास घातक मानले जातात. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात घेतलेले नमुने दूषित निघाले आहे. यावरून पावसाळ्यातील पाण्याची गुणवत्ता काय असेल याची कल्पना येते. शहराअंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी गटारामध्येच नळाचे वॉल आहे. पाणी सोडताना सर्व प्रथम हवेसोबत गटारातील पाणी पाईपमध्ये शिरते. यामुळेच नळाचे पाणी दूषित येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, असे पत्र आरोग्य सेवा उपसंचालक सुभाष कांबळे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांंना दिले आहे. आता यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नळातून दूषित पाणीपुरवठा येत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेत येतात. मात्र तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना थेट जीवन प्राधिकरणाचा रस्ता दाखविला जातो. नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना टोलवाटोलवी केली जाते. एकीकडे शहर स्वच्छतेचे नियोजन करणारी नगर परिषद थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.