शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाण्यासाठी संतप्त महिलांची जीवन प्राधिकरणात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:01 IST

शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन .....

ठळक मुद्देखुर्च्या, फाईली फेकल्या : १५ दिवसांपासून पाणीच नाही

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक करून फाईली फाडून टाकल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.शहराला सध्या १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र १२ दिवस लोटूनही अनेक परिसरात नळ आले नाही. गेल्या १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला. नगरपरिषदेच्या माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात धडक दिली. मात्र प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले मुंबईला गेल्याने महिलांचा पारा चांगलाच भडकला.महिलांनी त्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक केली. तेथे ठेवलेल्या अनेक फाईली फेकून दिल्या. महिलांचा रूद्रावतार बघून उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव व प्राधिकरणाचे कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या महिला कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत नळ येणार असल्याची ग्वाही दिल्यानंतरच महिला शांत झाल्या. महिलांनी धडक देताच पोलिसांना माहिती देण्यात आली. शहर पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांची समजूत काढली. सायंकाळपर्यंत नळ येण्याची ग्वाही मिळाल्यानंतरच महिलांनी सुटकेचा निश्वास सोडत घर गाठले.निळोणा, चापडोहात पाणीच नाहीशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह धरणात पाणीसाठाच नसल्याचे उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले. याबाबत लोकांमध्ये जागृती का केली जात नाही, असा प्रश्न विचारला असता ते निरूत्तर झाले. त्यांनी पाण्याची इत्थंभूत माहिती नागरिकांना देण्यास प्राधिकरण कमी पडत असल्याची कबुली दिली. यापुढे शहरात आॅटोरिक्षाद्वारे पाणी सोडण्याबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणी