शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पाण्यासाठी संतप्त महिलांची जीवन प्राधिकरणात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:01 IST

शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन .....

ठळक मुद्देखुर्च्या, फाईली फेकल्या : १५ दिवसांपासून पाणीच नाही

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक करून फाईली फाडून टाकल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.शहराला सध्या १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र १२ दिवस लोटूनही अनेक परिसरात नळ आले नाही. गेल्या १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला. नगरपरिषदेच्या माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात धडक दिली. मात्र प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले मुंबईला गेल्याने महिलांचा पारा चांगलाच भडकला.महिलांनी त्यांच्या कक्षातील खुर्च्यांची फेकाफेक केली. तेथे ठेवलेल्या अनेक फाईली फेकून दिल्या. महिलांचा रूद्रावतार बघून उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव व प्राधिकरणाचे कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या महिला कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत नळ येणार असल्याची ग्वाही दिल्यानंतरच महिला शांत झाल्या. महिलांनी धडक देताच पोलिसांना माहिती देण्यात आली. शहर पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांची समजूत काढली. सायंकाळपर्यंत नळ येण्याची ग्वाही मिळाल्यानंतरच महिलांनी सुटकेचा निश्वास सोडत घर गाठले.निळोणा, चापडोहात पाणीच नाहीशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह धरणात पाणीसाठाच नसल्याचे उपकार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले. याबाबत लोकांमध्ये जागृती का केली जात नाही, असा प्रश्न विचारला असता ते निरूत्तर झाले. त्यांनी पाण्याची इत्थंभूत माहिती नागरिकांना देण्यास प्राधिकरण कमी पडत असल्याची कबुली दिली. यापुढे शहरात आॅटोरिक्षाद्वारे पाणी सोडण्याबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणी