शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:10 IST

जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : झरी, दिग्रस, दारव्ह्यातील प्रत्येकी दोन प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे. प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहेत.विविध नगरपरिषद व नगरपंचायतीत सुरू असलेल्या कारभार विरोधातही कलम ३०८ अंतर्गत याचिका करण्यात आल्या आहेत. एकूण १६ प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू आहेत. यामध्ये नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ अन्वये सदस्यत्व रद्द करण्याच्याच याचिका सर्वाधिक आठ आहेत. झरी नगरपंचायतीचे विलास मारोती डोहे, प्रवीण लेनगुरे, ज्योती संजय बिजगुनवार यांच्या विरोधात २२ मार्च २०१६ रोजी याचिका करण्यात आली. दिग्रस नगरपरिषदेचे सदस्य सुभाष परसराम साबू, विजयकुमार बंग, दारव्हा येथील नगरसेवक दामोधर नगरसिंगदास लढ्ढा, शुभम रामदास गवई, खान फिरदोस मुसब्बील खान यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. उमरखेड येथील मुजीवर रहेमान अब्दूल रहेमान यांच्यावर अपत्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. यातील झरी वगळता सर्व नगरपरिषदांचे प्रकरणे २०१७ मधील आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी सुरू आहे.या व्यतिरिक्त आठ नगरपरिषदांतील विविध स्वरूपाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यातील मजेशीरबाब म्हणजे अनेक याचिकाकर्ते हे सत्ताधारीच नव्हेत खुद्द नगरपरिषदेत पदाधिकारी आहेत. त्यानंतरही त्यांच्याकडून ३०८ कलमा अंतर्गत याचिका करण्यात आली आहे. ज्या नगरपरिषदेतून सर्वाधिक याचिका तेथे अंतर्गत अनागोंदी अधिक असे परिमाण ठरले आहे.हितसंबंधातून चुकीच्या आधारावर याचिकायवतमाळ नगरपरिषदेने एक वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन अद्यापपर्यंत शहरातील घनकचऱ्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. याच पध्दतीने विविध कामांचा निविदा केवळ पालिका प्रशासनातील हितसंबधामुळे चुकीच्या पद्धतीने राबविले जाते. याच चुकांचा आधार घेऊन याचिका दाखल होतात. जाणीवपूर्वक केलेल्या चुकीच्या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील कमिशनखोरी कमी होऊन याचिका दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल.अंतर्गत वाद शिगेलाजिल्ह्यात बहुतांश नगरपरिषदांमध्ये भाजपा किंवा युतीची सत्ता आहे. त्यानंतरही स्थानिक नेत्यांना हा वाद पालिकास्तरावर निकाली काढण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते. अंतर्गत वादावादीतूनच केंद्र व राज्यशासनाचा निधी कधीच वेळेत खर्च होत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.