शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:10 IST

जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : झरी, दिग्रस, दारव्ह्यातील प्रत्येकी दोन प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे. प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहेत.विविध नगरपरिषद व नगरपंचायतीत सुरू असलेल्या कारभार विरोधातही कलम ३०८ अंतर्गत याचिका करण्यात आल्या आहेत. एकूण १६ प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू आहेत. यामध्ये नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ अन्वये सदस्यत्व रद्द करण्याच्याच याचिका सर्वाधिक आठ आहेत. झरी नगरपंचायतीचे विलास मारोती डोहे, प्रवीण लेनगुरे, ज्योती संजय बिजगुनवार यांच्या विरोधात २२ मार्च २०१६ रोजी याचिका करण्यात आली. दिग्रस नगरपरिषदेचे सदस्य सुभाष परसराम साबू, विजयकुमार बंग, दारव्हा येथील नगरसेवक दामोधर नगरसिंगदास लढ्ढा, शुभम रामदास गवई, खान फिरदोस मुसब्बील खान यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. उमरखेड येथील मुजीवर रहेमान अब्दूल रहेमान यांच्यावर अपत्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. यातील झरी वगळता सर्व नगरपरिषदांचे प्रकरणे २०१७ मधील आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी सुरू आहे.या व्यतिरिक्त आठ नगरपरिषदांतील विविध स्वरूपाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यातील मजेशीरबाब म्हणजे अनेक याचिकाकर्ते हे सत्ताधारीच नव्हेत खुद्द नगरपरिषदेत पदाधिकारी आहेत. त्यानंतरही त्यांच्याकडून ३०८ कलमा अंतर्गत याचिका करण्यात आली आहे. ज्या नगरपरिषदेतून सर्वाधिक याचिका तेथे अंतर्गत अनागोंदी अधिक असे परिमाण ठरले आहे.हितसंबंधातून चुकीच्या आधारावर याचिकायवतमाळ नगरपरिषदेने एक वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन अद्यापपर्यंत शहरातील घनकचऱ्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. याच पध्दतीने विविध कामांचा निविदा केवळ पालिका प्रशासनातील हितसंबधामुळे चुकीच्या पद्धतीने राबविले जाते. याच चुकांचा आधार घेऊन याचिका दाखल होतात. जाणीवपूर्वक केलेल्या चुकीच्या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील कमिशनखोरी कमी होऊन याचिका दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल.अंतर्गत वाद शिगेलाजिल्ह्यात बहुतांश नगरपरिषदांमध्ये भाजपा किंवा युतीची सत्ता आहे. त्यानंतरही स्थानिक नेत्यांना हा वाद पालिकास्तरावर निकाली काढण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते. अंतर्गत वादावादीतूनच केंद्र व राज्यशासनाचा निधी कधीच वेळेत खर्च होत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.