शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

बीटीच्या शेकडो पाकिटांची बोदड नाल्यात विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:19 IST

बोगस बिटी बियाण्यांविरुद्ध सर्वत्र प्रचंड ओरड होत असतानाच बीटी-२ बियाण्यांच्या शेकडो पाकिटांची यवतमाळनजीकच्या बोदड येथील नाल्यात परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देकपाशी बियाणे : २०१६ चा साठा काढला २०१८ मध्ये बाहेर

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस बिटी बियाण्यांविरुद्ध सर्वत्र प्रचंड ओरड होत असतानाच बीटी-२ बियाण्यांच्या शेकडो पाकिटांची यवतमाळनजीकच्या बोदड येथील नाल्यात परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याच एक्सपायरी झालेल्या पाकिटातील बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात विक्री झाली असावी असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने प्रचंड आक्रमण केले. त्यात कपाशीची शेती उद्ध्वस्त झाली. अळ्यांचे आक्रमण होणार नाही, असा दावा करीत जादा दराने बिटी बियाण्यांची विक्री केली गेली. परंतु अळ्यांच्या आक्रमणाने या बियाण्यांमधील ‘बिटी’चा दावा फोल ठरला. जणू अळ्यांनीच या बिटी बियाण्यांचे खरे स्वरूप उघड केले. अळ्यांचे आक्रमण रोखण्यासाठी प्रचंड कीटकनाशक फवारणी केली गेली. त्या नादात जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने जीव गमवावा लागला.बोंडअळीच्या आक्रमणामुळे कपाशीच्या बिटी बियाण्यांभोवती संशयाचे वलय निर्माण झाले. कंपन्यानी बोगस बिटी बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याची ओरड झाली. ही ओरड काहीशी कमी होताच बियाण्यांचा तो बोगस साठा गोदामातून बाहेर काढला जात आहे. त्याची दुर्गम ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली जात आहे. असाच एक गंभीर प्रकार यवतमाळ-चौसाळा रोडवरील बोदड येथे बुधवारी उघडकीस आला. बोदड येथील नाल्यात बिटी बियाण्यांची शेकडो पाकिटे आढळून आली. या बियाण्यांवर एक्सपायरी डेट २०१६ असे नमूद आहे. यावरून २०१६ मध्ये एक्सपायरी झालेले हे बिटी बियाणे २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले असण्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. अशा बोगस बिटी बियाण्यांमुळेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे.नाल्यात फेकण्यात आलेले बिटीचे हे वाण अनेक शेतकऱ्यांच्या परिचयाचे नाही. या बियाण्याची उगवण शक्ती कमी होती. या बियाण्यावर बिटी-२ असा उल्लेख आहे. हे बियाणे विकण्याची संबंधित कंपनीला परवानगी होती का, होती तर ती कुणी दिली, अशी किती पाकिटे विकली गेली, या सर्व बाबी सध्या गुलदस्त्यातच आहे. या बियाण्यांमुळे शेतकरी दशोधडीला लागले. बोगस बियाण्यांवर धाडसत्र सुरू असताना कृषी सेवा केंद्र चालक आणि काही एजंटांनी असे बोगस बियाणे आणि औषधी दडवून ठेवल्या.विशेष म्हणजे त्यांचे बियाणे परत घेण्यास त्यांच्या मुख्य एजंटांनीही नकार दिला. यामुळे या बियाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता ती नाल्यात फेकली जात असल्याचे दिसून येते.कृषी खात्याच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्हकाही कृषी सेवा केंद्रांमध्ये नामांकित बियाणे आणि औषधाच्या तुलनेत परवाना नसलेल्याच वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस होत्या. कीटकनाशक मृत्यू प्रकरणानंतर असे बियाणे आणि औषधी कृषी केंद्रातून अचानक गायब झाल्या. परिणामी अनेक कृषी केंद्रे सध्या रिकामी आहे. अनेकांनी रात्रीतून बियाणे आणि कीटकनाशकांची विल्हेवाट लावली. आता दडवून ठेवलेले उर्वरित बियाणे अशा पद्धतीने फेकले जात आहे.