शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

हद्दवाढ क्षेत्रात विदारक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:58 IST

येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही.

ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : कचरा उचलणारी यंत्रणाच पोहोचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे.नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही. भोसा, वडगाव, उमरसरा, लोहारा, मोहा, वाघापूर, पिंपळगाव येथील अनेक वस्त्यांमध्ये आजतागायत स्वच्छतेची यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीने नागरिक घरासोमर कचरा जाळून नष्ट करतात. सुरूवातील ग्रामपंचायत म्हणून अस्तित्व असलेल्या भागात आता घंटागाडी बंद पडली आहे. शक्य होईल त्या ठिकाणी आठवड्यातून कधीतरी एकदा ट्रॅक्टर पोहोचतो. उर्वरित दिवस कचरा जागा मिळेल तेथे फेकला जातो.वाढीव क्षेत्रातील अनेक भागात रस्तेच नसल्याने पावसाळ््यात कोणतेच वाहन पोहोचत नाही. नगरपरिषदेतील जुन्या प्रभागांमध्ये हातगाडी व घंटागाडीचा पर्याय आहे. इतर ठिकाणी त्याचीही सोय नाही. रस्ते नसल्याने हातगाडी, घंटागाडी चालविणे शक्यच नाही.उमरसरा आणि वडगावमधील काही भाग हा उतारकड्याचा आहे. तेथूून कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टरचीच आवश्यकता आहे. मात्र दहा ते १५ हजार लोकसंख्येच्या प्रभागात केवळ एका ट्रॅक्टरचे नियोजन आहे. शहराचे पाच झोनमध्ये विभाजन केले असून मध्यवर्ती भागातच आरोग्य विभागाची यंत्रणा दिसून येते. उर्वरित भागात अद्याप अतिशय विदारक स्थिती आहे. विकासाच्या गप्पा हाकणारे पुढारी शहरातील कचराही पूर्णपणे उचलून त्यावर प्रक्रिया करू शकत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे.मोहा परिसरासह प्रभाग २४, २५, २६, २७ आणि २८ मध्ये घंटागाडी फिरणे बंद आहे. वाघापूरमधील प्रभाग १३ व १५ मध्ये ट्रॅक्टरने कचरा संकलन केले जात आहे. दरम्यान, नगरपरिषदेने ‘निगसर्गाकडून निसर्गाकडे’ संकल्पना राबवीत सेंद्रीय खत निर्मिती कुंड तयार केले होते. यातील केवळ संजय गांधी शाळा आणि पालिकेच्या दवाखान्यातील कुंड सध्या सुस्थितीत आहे. उर्वरित कुंड्यांमध्ये झुडपे उगवली असून निर्र्मिती केल्यानंतर त्या कुंड्यांकडे कुणीच फिरकले नाही. शहरातून दिवसाकाठी ७० मेट्रीक टन कचरा निघत असल्याचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला. सहा मेट्रीक टनापासून गांडूळ खत तयार केले जाते. शहराच्या विविध भागातील वेस्ट त्यासाठी वापरले जाते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ