शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.

ठळक मुद्देबदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी ठाण मांडून आहे. बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. अशा कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.प्रशासकीय बदली झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी जुन्याच विभागात कायम राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावून कार्यमुक्त होण्यास टाळाटाळ केली. आता ही बाब सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लक्षात आली. त्यांनी नव्याने सर्व विभाग प्रमुख आणि बीडीओंना आदेश निर्गमित केले. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले.

बदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादासीईओंनी यावेळी बदली धोरणातही बदल केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार १५ टक्केच्यावर बदल्या होणार नाही. आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त, पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली त्याच क्षेत्रांतर्गत करता येणार आहे. ज्या कार्यालयात यापूर्वी काम केले अशा कार्यालयात १५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करता येणार नाही. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र राहणार आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कार्यरत कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रशासकीय बदलीस पात्र ठरणार आहे. प्रशासकीय व विनंती बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची आपसी बदली होणार नाही.बाॅक्स

कारणे दाखवा नोटीससीईओंनी संबंधित विभाग प्रमुख  आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप का कार्यमुक्त केले नाही,  याचा खुलासा मागितला आहे.      तसेच जे अधिकारी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार     नाही त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग  कारवाई करण्याचा इशारा दिला  आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली