शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.

ठळक मुद्देबदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी ठाण मांडून आहे. बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. अशा कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.प्रशासकीय बदली झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी जुन्याच विभागात कायम राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावून कार्यमुक्त होण्यास टाळाटाळ केली. आता ही बाब सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लक्षात आली. त्यांनी नव्याने सर्व विभाग प्रमुख आणि बीडीओंना आदेश निर्गमित केले. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले.

बदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादासीईओंनी यावेळी बदली धोरणातही बदल केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार १५ टक्केच्यावर बदल्या होणार नाही. आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त, पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली त्याच क्षेत्रांतर्गत करता येणार आहे. ज्या कार्यालयात यापूर्वी काम केले अशा कार्यालयात १५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करता येणार नाही. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र राहणार आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कार्यरत कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रशासकीय बदलीस पात्र ठरणार आहे. प्रशासकीय व विनंती बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची आपसी बदली होणार नाही.बाॅक्स

कारणे दाखवा नोटीससीईओंनी संबंधित विभाग प्रमुख  आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप का कार्यमुक्त केले नाही,  याचा खुलासा मागितला आहे.      तसेच जे अधिकारी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार     नाही त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग  कारवाई करण्याचा इशारा दिला  आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली