शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास प्रस्तावावर ३ मे रोजी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:28 IST

जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींविरूद्ध शिवसेना-भाजपने संयुक्तपणे अविश्वास दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता येत्या ३ मे रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : तीन सभापतींवर टांगती तलवार, विशेष सभा, शिवसेना, भाजपाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींविरूद्ध शिवसेना-भाजपने संयुक्तपणे अविश्वास दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता येत्या ३ मे रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेत तूर्तास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षाची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला बाहेर ठेवून भाजपाने सत्तेची मोट बांधली होती. तडजोडीतून काँग्रेसला अध्यक्ष व एक सभापतीपद, राष्ट्रवादी व अपक्षाला प्रत्येकी एक सभापतीपद, तर भाजपला दुसºया क्रमांकाच्या पदासह एक सभापतीपद मिळाले होते. दोन वर्षे सुखाने संसार केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीमुळे मात्र ही विचित्र युती संकटात सापडली.लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघात युतीतर्फे भाजपचे उमेदवार होते. मात्र जोपर्यंत जिल्हा परिषदेत युती होत नाही, तोपर्यंत त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे थेट मातोश्री व भाजपाच्या मुख्यालयातून सूत्रे हलली. अखेर भाजपने शिवसेनेसमोर नमते घेत तीन सभापतींवर अविश्वास दाखल करण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार बांधकाम सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडळकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरूद्ध शिवसेना-भाजपच्या ३८ सदस्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. आता या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ३ मे रोजी विशेष सभा होणार आहे. या सभेत नेमके काय घडते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.अध्यक्षांना वगळण्यामागील रहस्य कायमशिवसेना-भाजपने एकत्र येत तीन सभापतींवर अविश्वास आणला. मात्र यातून अध्यक्षांना वगळण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. अध्यक्षांनीही अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यांच्याच सहकाºयांवर अविश्वास येत असताना त्या मूग गिळून आहे. यामागे नेमके कोणते राजकारण शीजत आहे, याची जनतेला उत्सुकता आहे. दुसरीकडे अविश्वास पारित होण्यासाठी किमान ४१ सदस्यांची गरज भासणार आहे. शिवसेना-भाजपकडे ३८ सदस्य आहे. त्यामुळे तीन सदस्य कुठून आणणार, हा प्रश्न आहे. हे सदस्य आणण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतल्याची माहिती एका शिवसेना सदस्याने दिली.