शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अविश्वास प्रस्तावावर ३ मे रोजी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:28 IST

जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींविरूद्ध शिवसेना-भाजपने संयुक्तपणे अविश्वास दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता येत्या ३ मे रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : तीन सभापतींवर टांगती तलवार, विशेष सभा, शिवसेना, भाजपाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींविरूद्ध शिवसेना-भाजपने संयुक्तपणे अविश्वास दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता येत्या ३ मे रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेत तूर्तास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षाची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला बाहेर ठेवून भाजपाने सत्तेची मोट बांधली होती. तडजोडीतून काँग्रेसला अध्यक्ष व एक सभापतीपद, राष्ट्रवादी व अपक्षाला प्रत्येकी एक सभापतीपद, तर भाजपला दुसºया क्रमांकाच्या पदासह एक सभापतीपद मिळाले होते. दोन वर्षे सुखाने संसार केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीमुळे मात्र ही विचित्र युती संकटात सापडली.लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघात युतीतर्फे भाजपचे उमेदवार होते. मात्र जोपर्यंत जिल्हा परिषदेत युती होत नाही, तोपर्यंत त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे थेट मातोश्री व भाजपाच्या मुख्यालयातून सूत्रे हलली. अखेर भाजपने शिवसेनेसमोर नमते घेत तीन सभापतींवर अविश्वास दाखल करण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार बांधकाम सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडळकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरूद्ध शिवसेना-भाजपच्या ३८ सदस्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. आता या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ३ मे रोजी विशेष सभा होणार आहे. या सभेत नेमके काय घडते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.अध्यक्षांना वगळण्यामागील रहस्य कायमशिवसेना-भाजपने एकत्र येत तीन सभापतींवर अविश्वास आणला. मात्र यातून अध्यक्षांना वगळण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. अध्यक्षांनीही अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यांच्याच सहकाºयांवर अविश्वास येत असताना त्या मूग गिळून आहे. यामागे नेमके कोणते राजकारण शीजत आहे, याची जनतेला उत्सुकता आहे. दुसरीकडे अविश्वास पारित होण्यासाठी किमान ४१ सदस्यांची गरज भासणार आहे. शिवसेना-भाजपकडे ३८ सदस्य आहे. त्यामुळे तीन सदस्य कुठून आणणार, हा प्रश्न आहे. हे सदस्य आणण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतल्याची माहिती एका शिवसेना सदस्याने दिली.