शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

समाज कल्याण विभागाच्या खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:54 IST

समाज कल्याण विभागांतर्गत येणारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्यांशी झालेला करार संपुष्टात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकरार संपला स्थानिक व्यवस्थेचा सुचविला पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाज कल्याण विभागांतर्गत येणारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्यांशी झालेला करार संपुष्टात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कामे करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थेचा पर्याय समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी सुचविला आहे.समाज कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, सामाजिक न्याय भवन, इमारत आदी ठिकाणी कामे करण्यासाठी माळी, सुरक्षा व्यवस्था आदींसाठी शेकडो कर्मचारी दोन कंपन्यांमार्फत नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्रात दोन कंपन्यांनी या कामासाठी कर्मचारी पुरविले. आता या कंपन्यांचा करार संपुष्टात आला आहे.सदर कंपन्यांमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना आठ ते दहा हजार रुपये मानधन दिले जात होते. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयविषयक विविध कामे करून घेतली जात होती. आता या कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. पर्यायाने त्यांच्यापुढे रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. आता या सर्व कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवस्था केली जावी, असे समाज कल्याण आयुक्त (महाराष्ट्र राज्य पुणे) मिलिंद शंभरकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडासमाज कल्याण विभागात स्थायी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांची गती मंदावली जाते. बहुतांश कामे कंपन्यांकडून नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जातात. आता या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याने समाज कल्याण विभागाची प्रशासकीय कामे आणखी रेंगाळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

टॅग्स :Governmentसरकार