शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

थकबाकीदार सेवा सोसायट्यांचे संचालक बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागली आहे. अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने मतदान घेण्याची वेळ सोसायट्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणूक : ‘बँक प्रतिनिधी’ म्हणून जाण्याच्या आशा मावळल्या, ‘जेटीं’च्या आदेशाने रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याकरिता बँकेवर प्रत्येक सोसायटीतून एक प्रतिनिधी पाठविला जातो. परंतु यावेळी थकबाकीदार असलेल्या सोसायट्यांचे प्रतिनिधी अपात्र ठरणार असल्याने आपसुकच बाद होणार आहे. त्याऐवजी आता थकबाकीदार नसलेल्या सभासदाला पाठविण्याचा पर्याय पुढे आला आहे.जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागली आहे. अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने मतदान घेण्याची वेळ सोसायट्यांवर आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून बँकेवर एकच संचालक मंडळ कायम आहे. या मंडळाने दोन नोकरभरत्या घेतल्या आहेत. या दोन्ही भरत्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजल्या आहेत. आता झालेली दुसरी भरती अद्याप पूर्णत्वास गेली नसली तरी त्यासाठी झालेला घोडेबाजार सर्वश्रृत आहे. गेल्या १२ वर्षात प्रचंड आर्थिक उलाढाल बँकेत झाल्याने या निवडणुकीत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गंगा वाहण्याची अपेक्षा आहे. त्याचे लाभार्थी होता यावे म्हणूनच सोसायट्यांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र जिल्हाभर पहायला मिळते. परंतु यावेळी विभागीय सहनिबंधकांच्या एका आदेशाने गोंधळ निर्माण झाला आहे. थकबाकीदार व्यक्ती अथवा संस्थेचा संचालक बँकेवर प्रतिनिधी म्हणून पाठविल्यास तो अपात्र ठरेल, त्याऐवजी थकबाकीदार नसलेला बँकेचा कुणीही सभासद प्रतिनिधी म्हणून पाठवावा असे या आदेशात नमूद आहे. पहिल्यांदाच ही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे बँकेवर प्रतिनिधी म्हणून येऊ इच्छिणाऱ्या बहुतेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.जिल्ह्यात साडेपाचशे पेक्षा अधिक विविध कार्यकारी संस्था, आदिवासी संस्था व सेवा सहकारी सोसायट्या आहेत. सततच्या नापिकीमुळे यापैकी ९५ टक्के संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार आहेत. त्यामुळे या संस्थांवरील व्यवस्थापकीय संचालक मंडळामधून बँक प्रतिनिधी निवडले जाऊ शकत नाही आणि निवडले गेलेच असेल तर ते पुढे अपात्र ठरणार आहे. या आदेशामुळे जिल्हाभरातील सेवा सोसायट्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक सोसायट्यांनी अद्याप बँक प्रतिनिधी निवडलेले नाही. सेवा सोसायट्यांचे संचालक राजकारणी असतात, निवडणुकीत ते अनेक डावपेच खेळतात, सर्वच मतदारांना होकार देतात त्यामुळे संचालकांना नेमक्या स्थितीचा अंदाज येत नाही. म्हणून या संचालक मंडळानेच सहकार प्रशासनाला हाताशी धरुन आदेशात ही जाचक अट समाविष्ठ करून घेतली नाही ना अशी शंकाही सहकार क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. कारण सोसायट्यांचे थकबाकीदार नसलेले सभासद बँक प्रतिनिधी म्हणून आल्यास त्यांना निवडणुकांचा तेवढा अनुभव नसतो व बँकेच्या संचालक मंडळासाठी त्यांचे मत मिळविणे सहज सोपे जाते म्हणून ही खेळी असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.‘कारवाई’ सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांवर, ‘लाभ’ मात्र सर्वांनाच हवा !सेवा सहकारी सोसायट्या तोट्यात आहेत. बहुतांश थकबाकीदार आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये तर फारशी उलाढालही नाही. अशा सोसायट्यांमध्ये किरकोळ अफरातफर झाली तरी थेट अध्यक्ष व सचिवावर गुन्हे नोंदविले जातात. त्यांनाच त्याचा सामना करावा लागतो. परंतु आता बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाताना या अध्यक्षाला मोठ्या मनाने तेवढे अधिकार दिले जात नाही. त्याऐवजी बँक प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड चढाओढ लागली आहे. ते पाहता कारवाईला अध्यक्ष-सचिव पुढे आणि लाभाच्या पदासाठी सर्वांचाच पुढाकार अशी स्थिती सोसायट्यांमध्ये निर्माण झाली आहे. संकटाला पुढे जाणाऱ्या अध्यक्षाला बँक प्रतिनिधी म्हणून जाण्यासही पुढे करावे, अशी मागणी अनेक सोसायट्यांमधून पुढे आली आहे.

टॅग्स :bankबँक