शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अमेरिकेतील नोकरी सोडून बनला दिग्दर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:34 IST

अमेरीकेतील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देवधरी येथील अच्युत चोपडे या युवकाने थेट चित्रपटसृष्टीत पाय रोवले. ‘लोकमत’ने पांढरकवडा येथे त्याची मुलाखत घेऊन मांडलेला हा त्याचा जीवनपट अनेकांना प्रेरक ठरू शकतो.

ठळक मुद्देदेवधरीचा अच्युत चोपडे : पांढरकवड्यात ‘बा तु भिऊ नकोस’ या चित्रपटाचे चित्रीकरण

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : अमेरीकेतील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देवधरी येथील अच्युत चोपडे या युवकाने थेट चित्रपटसृष्टीत पाय रोवले. ‘लोकमत’ने पांढरकवडा येथे त्याची मुलाखत घेऊन मांडलेला हा त्याचा जीवनपट अनेकांना प्रेरक ठरू शकतो.पांढरकवडा परिसरात ‘बा तु भीऊ नकोस’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. यानिमित्ताने पांढरकवडा येथे आले असता, अच्युत चोपडे यांच्याशी बातचित केली, त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिले. मी स्वत: या भागातील मुळचा रहिवासी असल्यामुळे या परिसरातील समस्यांची मला जाणिव आहे, त्यादृष्टीने विदर्भातील गाव निवडायचे असल्याने मी परिसरातील पांढरकवडा, पांढरदेवी, पारवा ही गावे चित्रीकरणासाठी निवडल्याचे त्यांनी सांगितले. आपले प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पारवा व घाटंजी येथे झाले असून त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मला लहानपणापासून कथा सांगायला व लिहायला आवडायच्या, शाळा व महाविद्यालयात असताना मी स्वत: नाटके लिहिली व त्यांचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो, तेव्हापासूनच मला आवड निर्माण झाली, असे चोपडे म्हणाले.अमरावती येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात असताना कस्ती हे नाटक लिहीले व ते प्रदर्शित केले. हे नाटक श्रोत्यांना एवढे आवडले की, अक्षरश: त्यांनी डोक्यावर घेतल्याचे ते म्हणाले. यावेळी बेस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर आपण नोकरीनिमित्ताने पुणे येथे गेलो, त्यानंतर पुण्याहून अमेरिकेत गेलो, परंतु तेथे माझे मन रमत नव्हते, चार वर्षानंतर तेथून पुण्यात परत आलो, त्यानंतर हैद्राबाद येथील अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ फिल्म इन मिडीया हा कोर्स केला व नंतर पुण्याला गेलो. तेथे अर्धविराम, रिटर्न गीफ्ट्स हे लघूपट काढले. या लघुपटामुळे माझे मनोधैर्य वाढले व मी ‘बा तु भिऊ नको’ हा चित्रपट काढायचे ठरविले. या चित्रपटात योगेश सोमन, गितांजली कुलकर्णी, शरद जाधव, निता दोंधे, अनया पाठक यांच्या भूमिका आहेत.