शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जिल्हा बँकेचे संचालक लागले प्रचाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ पदांची गाजलेली नोकरभरती आणि त्या अनुषंगाने झालेली ‘उलाढाल’ सर्वश्रृत असल्याने विद्यमान संचालकांना ही निवडणूक सोपी नाहीच, या निवडणुकीचे ‘बजेट’ चांगलेच वाढणार आहे. भरतीतील ‘उलाढाल’ व १२ वर्षांपासून बँकेवर असलेली सत्ता याबाबी सर्वश्रृत असल्याने मतदारही सहजासहजी कुणाला शब्द देण्याच्या तयारीत नाही.

ठळक मुद्देइच्छुकांचीही मोेर्चेबांधणी : १५ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली. मतदानाला आणखी किमान दोन महिने अवधी असला तरी बँकेचे संचालक आतापासूनच प्रचाराला लागले आहेत. बँकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनीही जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची संख्या २८ आहे. परंतु बैद्यनाथन आयोगाच्या निर्देशानुसार ही संख्या आता सातने कमी करून २१ वर आणण्यात आली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी २६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक घेतली जात आहे. मतदार याद्यांना अंतिम स्वरूप देण्याची कार्यवाही विभागीय सहनिबंधकांकडे सुरू आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, त्या दिवसापासूनच जिल्हा बँकेचे मुख्यालय व विभागीय कार्यालयांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. संचालकांच्या बैठकांवर बैठका होत आहे. निवडणुकीत कोणता पक्ष काय भूमिका घेईल, महाविकास आघाडी राहील काय, कुणाकुणाचे पॅनेल असेल, पॅनलमध्ये कुणाकुणाचा समावेश असेल, तालुका गटातून कोण लढणार, जिल्हा गटातून कुणाची नावे, आरक्षणाच्या जागांवर संभाव्य उमेदवार कोण, अशा विविध मुद्यांवर या बैठकांमध्ये चर्चांचा फड रंगतो आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ पदांची गाजलेली नोकरभरती आणि त्या अनुषंगाने झालेली ‘उलाढाल’ सर्वश्रृत असल्याने विद्यमान संचालकांना ही निवडणूक सोपी नाहीच, या निवडणुकीचे ‘बजेट’ चांगलेच वाढणार आहे. भरतीतील ‘उलाढाल’ व १२ वर्षांपासून बँकेवर असलेली सत्ता याबाबी सर्वश्रृत असल्याने मतदारही सहजासहजी कुणाला शब्द देण्याच्या तयारीत नाही. अनेक मतदार संचालकांकडून ‘हिशेब’ करण्याच्या मानसिकतेत आहेत. संचालकांना याची जाणीव आहे. संचालकांनी आतापासूनच मतदारांच्या भेटीगाठी, मोबाईलवरून संपर्क करून जणू प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांकडून ‘शब्द’ घेतला जात आहे.न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे तांत्रिक गोंधळ कायम आहे. सहकार प्रशासनालाही नेमके सांगणे कठीण आहे. सुनावणीच्या तारखा पुढे आहेत. त्यावर काय निर्णय येतो याकडे सर्वांच्या नजरा आहे. जिल्हा बँकेची ही निवडणूक १३-५-३ या फॉर्म्युल्यानुसार घेतली जाते की, १६-३-२ या फॉर्म्युल्यानुसार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळेच विद्यमान संचालक व इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती पहायला मिळते. विद्यमान संचालकांपैकी अर्धे अधिक संचालक बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यात काही निवडणुकीपूर्वी तर काही निवडणुकीनंतर पराभवामुळे बाद होतील, असा अंदाज बँकेच्या यंत्रणेत वर्तविला जात आहे.३९६ संस्थांचे प्रस्तावच आले नाहीजिल्हा गटामध्ये औद्योगिक, डेअरी, मच्छीमार, स्वयंरोजगार, ग्रामीण, आदिवासी, गृहनिर्माण अशा ८४४ संस्था आहेत. परंतु त्यापैकी ३९६ संस्थांकडून बँक प्रतिनिधीचे प्रस्तावच सहकार प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे एवढे मतदार जवळजवळ बाद ठरल्याचे मानले जाते. अवसायनात निघणे, सहकार प्रशासनाने नोंदणी रद्द करणे, आॅडिट न होणे, बंद असणे, पत्र वेळेत न मिळणे आदी कारणांमुळे या संस्थांनी प्रस्ताव पाठविले नसल्याचे सांगितले जाते. मात्र यातील काहींनी सहनिबंधकांकडे आक्षेप नोंदवून आपली चूक सुधारण्याचा व बँकेवर प्रतिनिधी पाठविण्यासाठी धडपड चालविली आहे. 

टॅग्स :bankबँक