शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बाणगाव प्रकल्पाच्या भूसंपादनात थेट वाटाघाटी

By admin | Updated: May 7, 2016 02:32 IST

सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी प्रशासनाला विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत.

यावर्षी घळभरणी : २८५ हेक्टर सिंचन निर्मिती होणार, प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ११ कोटींवरनेर : सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी प्रशासनाला विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. या बाबींमुळे शेतकरी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रचंड अडचणी सहन कराव्या लागतात. मात्र तालुक्याच्या बाणगाव लघु प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना नवा प्रयोग स्थापित झाला आहे. सरळ वाटाघाटीने कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या घळभरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी भूसंपादनावर लक्ष केंद्रित केले होते. पहिल्यांदा ६ कोटी १८ लाख रुपये किमतीच्या या लघु प्रकल्पास २००७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या नियोजित लाभक्षेत्रापैकी २६० हेक्टर क्षेत्र डोल्हारी मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने बाणगाव प्रकल्पाचे सुधारित लाभक्षेत्र २८५ हेक्टर उपसाद्वारे प्रस्तावित करण्यात आले होते, त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली होती. आता या प्रकल्पास बाणगाव साठवण तलाव असे संबोधित करण्यात येत आहे. बाणगाव प्रकल्पाची धरण बैठक, आगमन, पुच्छ वाहिका व सांडवे याकरिता ८.०३ हेक्टर व बुडित क्षेत्रासासठी ५५.३० अशी एकूण ६३.३३ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. आतापर्यंत ४९.४८ हेक्टर जमीन सरळ खरेदीद्वारे भूसंपादित करण्यात आली. उर्वरित १३.८३ हेक्टर जमिनही थेट खरेदीने संपादनाची प्रक्रियाही गतीने सुरू आहे. जमिनीची संयुक्त मोजणी व त्यास खरेदीची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ११ कोटी ४८ लाख इतकी आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता किमतीपेक्षा जास्त खर्च करण्याची परवानगी प्राप्त आहे. सध्या गतवर्षीचे २ कोटी ३० लाख रुपये उपलब्ध आहे. येत्या जूनमध्ये प्रकल्पाची घळभरणी अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करताना नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मूळ दर २०१५ मध्ये निश्चित केल्याप्रमाणे घेण्यात आला आहे. जमिनीची रक्कम व पुनर्वसन अनुदान मिळून येणाऱ्या रकमेवर २५ टक्के अतिरिक्त दिलासा रक्कम घेण्यात आली आहे. त्यामुळे थेट खरेदीने खरेदीस मदत झाली आहे, असे लघु पाटबंधारे सर्वेक्षण उपविभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. या प्रकल्पातून २८५ हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी भूसंपादन जलदगतीने होऊन जमिनीचा ताबा मिळणे आवश्यक होते. थेट खरेदीने भूसंपादन झाल्याने घळभरणी शक्य असल्याचे कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)