शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

१२ लाख आदिवासींच्या खात्यात थेट खावटी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनरुज्जीवन योजनेंतर्गत चार हजार रुपयांच्या निर्वाह अनुदानास पात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देप्रती कुटुंब चार हजार : शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, तिवारींचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या आदिवासी व वनवासी पाड्यातील कुटुंबातील एक कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांना रोख अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रोख निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिवारी यांनी राज्य सरकारचे स्वागत केले आहे.राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनरुज्जीवन योजनेंतर्गत चार हजार रुपयांच्या निर्वाह अनुदानास पात्र ठरविण्यात आले. यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या आदिवासींना मोठा दिलासा मिळाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोजकुमार सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या योजनेच्या अंमलबजावणीची देखरेख करणार आहे. पुढील महिन्यात रोख हस्तांतरणाची पहिली तुकडी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.राज्यात आदिवासींची लोकसंख्या एक कोटी २५ लाखाच्यावर आहे. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात ११ लाख ९५ हजार कुटुंब आहे. या सर्वांना सरसकट लाभ मिळणार आहे. आदिवासी विकास विभागाने वस्तू स्वरुपाची मदत प्रस्तावित केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ रोख हस्तांतरण करण्यास अनुकूलता दर्शविली. लॉकडाऊनने ग्रासलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना थेट रोख हस्तांतरणाची योजना तयार केली गेली. लॉकडाऊनमुळे किरकोळ वन्य उपजाचे संकलन व विक्री प्रभावित झाल्याने आदिवासी बांधव हवालदिल झाले होते. त्यांना थेट आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी आग्रही भूमिका तिवारी यांनी मांडली. आता या आर्थिक पॅकेजने आदिवासी व वनवासी समुदायाला दिलासा मिळाला. त्यामुळे सरकारच्या नवीन योजनेचे स्वागत असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.सरकारच्या निर्णयाचे स्वागत : अ‍ॅड. शिवाजीराव मोघेपांढरकवडा : ३० वर्षांपूर्वी काँग्रेसने राज्यात आदिवासी समाजबांधवांना रोख स्वरूपात खावटी देण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षे तो सुरू होता. परंतु भाजप सरकारमध्ये हा निर्णय फिरवून स्वरूप बदलविले गेले. आता पूर्वीचाच रोख खावटी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने पुन्हा लागू केल्याने आदिवासी समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. यावरून भाजप सरकार आदिवासी विरोधी असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघेgovernment schemeसरकारी योजना