शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिलीपकुमार जिंकून गेले यवतमाळवासीयांचेही मन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

दिलीपसाहेबांची आज ‘एक्झिट’ झालेली असतानाही त्यांची ४१ वर्षांपूर्वीची यवतमाळातील ‘एन्ट्री’ संस्मरणीय ठरली. १९८० मधील तो २५ डिसेंबरचा दिवस होता. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाने अखिल भारतीय सुवर्णपदक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी खासदार विजय दर्डा यांनी दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.

ठळक मुद्दे४१ वर्षांपूर्वी दिली होती भेट : आझाद मैदानावरील कबड्डी स्पर्धेच्या ‘त्या’ उद्‌घाटन सोहळ्याला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक दिलीपकुमार यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला आणि साऱ्या देशातील चाहते हळहळले. मात्र, जग जिंकणाऱ्या या अभिनेत्याने ४१ वर्षांपूर्वी यवतमाळात येऊन अवघ्या जिल्हावासीयांचे हृदय काबीज केले होते. पडद्यावर आवडलेला हा हीरो तेव्हा माणूस म्हणूनही किती ग्रेट आहे, याचा जिताजागता अनुभव जिल्ह्याने घेतला होता.दिलीपसाहेबांची आज ‘एक्झिट’ झालेली असतानाही त्यांची ४१ वर्षांपूर्वीची यवतमाळातील ‘एन्ट्री’ संस्मरणीय ठरली. १९८० मधील तो २५ डिसेंबरचा दिवस होता. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाने अखिल भारतीय सुवर्णपदक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी खासदार विजय दर्डा यांनी दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.खरे म्हणजे, दिलीपकुमार विदर्भात फारसे आले नाहीत. ते नागपूरव्यतिरिक्त इतर कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात आल्याचे ऐकिवात नाही. नागपूर येथील एनकेपी साळवे यांच्याशी त्यांची निकट मैत्री होती. त्यानंतर नामांकित विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांच्याशीही त्यांचे निकट संबंध राहिले.दर्डा कुटुंबीयांमुळे मात्र दिलीपकुमार यांना १९८० मध्ये यवतमाळात प्रत्यक्ष येण्याचा योग आला. या कबड्डीच्या सामान्याला त्यांच्यासह तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री शिवराज पाटीलही उपस्थित होते. विजय दर्डा यांचे मित्र श्याम दुनोदवाला यांच्यासोबत ते नागपूरमार्गे यवतमाळात आले. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी, मातोश्री वीणादेवी दर्डा, सुरेश दादा जैन, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, किशोर दर्डा, कीर्ती गांधी, तसेच हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवघ्या यवतमाळकरांतर्फे दिलीपकुमारांचे स्वागत केले. ही भेट अविस्मरणीय ठरली. 

आझाद मैदानात उलटला जनसागर- कबड्डी स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा यवतमाळच्या आझाद मैदानात होता. या कार्यक्रमात दिलीपकुमारांनी केलेले ओघवत्या हिंदीतील भाषण म्हणजे चाहत्यांसाठी अनोखी मेजवानीच होती. दिलीपसाहेबांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘माइल स्टोन’ असलेले दिलीपकुमार यवतमाळकरांनी प्रत्यक्ष पाहिले, अशी प्रतिक्रिया या उद्‌घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक ॲड. प्रवीण जानी यांनी व्यक्त केली. 

व्हीआयपी नव्हे, दिलखुलास माणूस- यवतमाळात आल्यावर दिलीपकुमार यांनी आपण अतिविशिष्ट व्यक्ती आहोत, असे मानून स्वत:ला गर्दीपासून दूर ठेवले नाही. एखाद्या सुरक्षित खोलीत एकांतवासात बसण्यापेक्षा त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आवर्जून भेट स्वीकारली. दिलखुलास हस्तांदोलन केले. भेटायला आलेले क्रीडाप्रेमी, नगर परिषद व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, चाहत्यांशी त्यांनी मोकळी चर्चा केली. क्रीडाप्रेमींकडून कबड्डी सामन्यांचे स्वरूप समजून घेतले. ‘लोकमत’च्या कार्याची व व्याप्तीची प्रशंसा केली.

 

टॅग्स :Dilip Kumarदिलीप कुमार