शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:34 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : परिसरातील रस्त्यांची दैनावस्था, धरणावर जाण्याचे मार्ग खुंटले

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.१५ दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अरुणावती धरणात ९० टक्के जलसाठा झाला. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यामुळे दिग्रससह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाकडे धाव घेतली. मात्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी धड रस्ते नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धानोरा येथे अरुणावती प्रकल्पाचे सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता डी.जे. राठोड यांना प्रकल्पाची दुर्र्दशा मात्र दिसून येत नाही.सावंगापासून चार किलोमीटर अंतरावर प्रकल्पाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दारे-खिडक्या, फर्निचर भरदिवसा चोरून नेले जात आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. विश्रामगृहापासून प्रकल्पापर्यंतचा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याने मोठे वाहन तर सोडाच दुचाकी किंवा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी धरणाच्या भिंतीत मुरत आहे. त्यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे.याच धरणाच्या निर्मितीमुळे दिग्रस तालुक्यातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार बाजूच्या दारव्हा आणि आर्णी शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे दिग्रस बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. तथापि, धरणाला आकर्षक बनवून हे व्यवहार दिग्रसकडे आकर्षित केले जावू शकतात. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.पर्यटन म्हणून विकास व्हावाअरुणावती धरणाचा पर्यटन म्हणून विकास झाल्यास दिग्रस तालुक्याला सुगीचे दिवस येवू शकतात. या धरणात मत्स्य निर्मिती केंद्र स्थापन केल्यास लाभ होवू शकतो. तसेच बोटींची व्यवस्था केल्यास नजीकच्या गावांमध्ये सहज जाणे-येणे होवू शकते. तसेच या गावांचा शहराशी तुटलेला संपर्क पूर्ववत होवू शकतो. विश्रामगृहाची दुरुस्ती करून तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला लाभ होवू शकतो. धरण परिसर स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास गर्दी वाढून लाभ मिळू शकतो. याकडे अरुणावती प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.