शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:34 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : परिसरातील रस्त्यांची दैनावस्था, धरणावर जाण्याचे मार्ग खुंटले

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.१५ दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अरुणावती धरणात ९० टक्के जलसाठा झाला. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यामुळे दिग्रससह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाकडे धाव घेतली. मात्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी धड रस्ते नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धानोरा येथे अरुणावती प्रकल्पाचे सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता डी.जे. राठोड यांना प्रकल्पाची दुर्र्दशा मात्र दिसून येत नाही.सावंगापासून चार किलोमीटर अंतरावर प्रकल्पाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दारे-खिडक्या, फर्निचर भरदिवसा चोरून नेले जात आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. विश्रामगृहापासून प्रकल्पापर्यंतचा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याने मोठे वाहन तर सोडाच दुचाकी किंवा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी धरणाच्या भिंतीत मुरत आहे. त्यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे.याच धरणाच्या निर्मितीमुळे दिग्रस तालुक्यातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार बाजूच्या दारव्हा आणि आर्णी शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे दिग्रस बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. तथापि, धरणाला आकर्षक बनवून हे व्यवहार दिग्रसकडे आकर्षित केले जावू शकतात. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.पर्यटन म्हणून विकास व्हावाअरुणावती धरणाचा पर्यटन म्हणून विकास झाल्यास दिग्रस तालुक्याला सुगीचे दिवस येवू शकतात. या धरणात मत्स्य निर्मिती केंद्र स्थापन केल्यास लाभ होवू शकतो. तसेच बोटींची व्यवस्था केल्यास नजीकच्या गावांमध्ये सहज जाणे-येणे होवू शकते. तसेच या गावांचा शहराशी तुटलेला संपर्क पूर्ववत होवू शकतो. विश्रामगृहाची दुरुस्ती करून तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला लाभ होवू शकतो. धरण परिसर स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास गर्दी वाढून लाभ मिळू शकतो. याकडे अरुणावती प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.