शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
3
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
4
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
5
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
6
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
7
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
8
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
9
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
10
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
11
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
12
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
13
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
14
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
15
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
16
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
17
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
18
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
19
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
20
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:34 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : परिसरातील रस्त्यांची दैनावस्था, धरणावर जाण्याचे मार्ग खुंटले

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.१५ दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अरुणावती धरणात ९० टक्के जलसाठा झाला. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यामुळे दिग्रससह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाकडे धाव घेतली. मात्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी धड रस्ते नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धानोरा येथे अरुणावती प्रकल्पाचे सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता डी.जे. राठोड यांना प्रकल्पाची दुर्र्दशा मात्र दिसून येत नाही.सावंगापासून चार किलोमीटर अंतरावर प्रकल्पाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दारे-खिडक्या, फर्निचर भरदिवसा चोरून नेले जात आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. विश्रामगृहापासून प्रकल्पापर्यंतचा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याने मोठे वाहन तर सोडाच दुचाकी किंवा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी धरणाच्या भिंतीत मुरत आहे. त्यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे.याच धरणाच्या निर्मितीमुळे दिग्रस तालुक्यातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार बाजूच्या दारव्हा आणि आर्णी शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे दिग्रस बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. तथापि, धरणाला आकर्षक बनवून हे व्यवहार दिग्रसकडे आकर्षित केले जावू शकतात. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.पर्यटन म्हणून विकास व्हावाअरुणावती धरणाचा पर्यटन म्हणून विकास झाल्यास दिग्रस तालुक्याला सुगीचे दिवस येवू शकतात. या धरणात मत्स्य निर्मिती केंद्र स्थापन केल्यास लाभ होवू शकतो. तसेच बोटींची व्यवस्था केल्यास नजीकच्या गावांमध्ये सहज जाणे-येणे होवू शकते. तसेच या गावांचा शहराशी तुटलेला संपर्क पूर्ववत होवू शकतो. विश्रामगृहाची दुरुस्ती करून तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला लाभ होवू शकतो. धरण परिसर स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास गर्दी वाढून लाभ मिळू शकतो. याकडे अरुणावती प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.