शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

By admin | Updated: October 20, 2014 23:20 IST

केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली.

किशोर वंजारी - नेरकेवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. या दोनही पक्षांना विजयाच्या जवळही जाता आले नाही. काँग्रेसचे देवानंद पवार यांना तर आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. पवार यांचा प्रचार तर ‘आयात उमेदवार’ असा झाला होता. एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या तत्कालीन दारव्हा विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांना पराभव चाखावा लागला. काँग्रेसचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर होता. कालांतराने या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पकड सैल झाली. मतदारराजा विविध कारणांमुळे काँग्रेसपासून दूर गेला. शिवसेनेचे संजय राठोड यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत केली. तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजयच नव्हे तर मताधिक्यही प्रचंड घेतले आहे. यावेळी तर त्यांनी मताधिक्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी केलेली विकास कामे कुणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अशक्यच, ही बाब तेवढीच सत्य असतानाही त्यांच्या विरोधात ‘पॉवरफूल’ उमेदवार रिंगणात नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने वसंत घुईखेडकर यांना उमेदवारी दिली. निवडणूक काळात त्यांनी जवळपास गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली उमेदवारी गावापर्यंत पोहोचविण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. परंतु संजय राठोड यांच्या तुलनेत बऱ्याच बाबतीत ते कमी पडले. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची तर अतिशय दैनावस्था झाली. देवानंद पवार हे या मतदारसंघासाठी नवीन होते. कार्यकर्त्यांची फळी नाही, मतदारसंघाची ओळख नाही आणि होते ते कार्यकर्ते यवतमाळात कार्यरत होते. या आणि इतर कारणांमुळे ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. केवळ १८ हजार ८०७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. तसे पाहिल्यास या मतदारसंघात येत असलेल्या नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच होते. अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आदी बाबींमुळे काँग्रेस खिळखिळी झाली आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर या पक्षाची सत्ता नाही. याच बाबी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी कारणीभूत ठरला.