शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

By admin | Updated: October 20, 2014 23:20 IST

केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली.

किशोर वंजारी - नेरकेवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. या दोनही पक्षांना विजयाच्या जवळही जाता आले नाही. काँग्रेसचे देवानंद पवार यांना तर आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. पवार यांचा प्रचार तर ‘आयात उमेदवार’ असा झाला होता. एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या तत्कालीन दारव्हा विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांना पराभव चाखावा लागला. काँग्रेसचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर होता. कालांतराने या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पकड सैल झाली. मतदारराजा विविध कारणांमुळे काँग्रेसपासून दूर गेला. शिवसेनेचे संजय राठोड यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत केली. तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजयच नव्हे तर मताधिक्यही प्रचंड घेतले आहे. यावेळी तर त्यांनी मताधिक्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी केलेली विकास कामे कुणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अशक्यच, ही बाब तेवढीच सत्य असतानाही त्यांच्या विरोधात ‘पॉवरफूल’ उमेदवार रिंगणात नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने वसंत घुईखेडकर यांना उमेदवारी दिली. निवडणूक काळात त्यांनी जवळपास गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली उमेदवारी गावापर्यंत पोहोचविण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. परंतु संजय राठोड यांच्या तुलनेत बऱ्याच बाबतीत ते कमी पडले. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची तर अतिशय दैनावस्था झाली. देवानंद पवार हे या मतदारसंघासाठी नवीन होते. कार्यकर्त्यांची फळी नाही, मतदारसंघाची ओळख नाही आणि होते ते कार्यकर्ते यवतमाळात कार्यरत होते. या आणि इतर कारणांमुळे ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. केवळ १८ हजार ८०७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. तसे पाहिल्यास या मतदारसंघात येत असलेल्या नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच होते. अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आदी बाबींमुळे काँग्रेस खिळखिळी झाली आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर या पक्षाची सत्ता नाही. याच बाबी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी कारणीभूत ठरला.