शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

धनगर बांधवांची एसपी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:37 IST

राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.

ठळक मुद्देराळेगावचे लाठीमार प्रकरण : ठाणेदाराच्या निलंबनाची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.राळेगाव तालुक्यातील वरूड(जहांगीर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून मेंढपाळांचे वास्तव्य आहे. हे मेंढपाळ वनविभागाच्या जंगलात मेंढ्या आणि घोड्यांना चराईसाठी नेतात. मात्र वनविभागाचे कर्मचारी त्यांना हुसकावून लावतात. त्यामुळे समाजबांधवांनी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी बुधवारी राळेगाव तहसील कार्यालयावर मेंढ्या व घोड्यांसह मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी क्रांती चौकात हा मोर्चा अडवून समाजबांधवांवर लाठीमार केला तसेच अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे.पोलिसांनी मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याचे कारण देत मोर्चा अडविल्याचे सांगितले होते. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, डॉ. संदीप धवने, डॉ. सुमित खांदवे, रोहन मस्के, जानकर, पुनसे, बुचे, भूषण खांदवे आदींच्या नेतृत्त्वात समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून त्यांनी राळेगाव ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी केली. ठाणेदाराचे त्वरित निलंबन न झाल्यास धनगर समाजातर्फे जिल्हाभर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी राळेगाव परिसरातील मेंढपाळ बांधवांसह जिल्ह्यातील धनगर समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस