शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहराचा विकास आराखडा गुलदस्त्यात

By admin | Updated: April 24, 2016 02:30 IST

शहराचा भविष्यातील विकास आराखडा शासनाच्या नगररचना विभागाने तयार केला. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून त्याला व्यापक प्रसिद्धी न देता ...

दलाल सक्रिय : आक्षेपांची मुदतही संपण्याच्या वाटेवरवणी : शहराचा भविष्यातील विकास आराखडा शासनाच्या नगररचना विभागाने तयार केला. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून त्याला व्यापक प्रसिद्धी न देता तो गुलदस्त्यात ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे काही दलाल भूखंडधारकांना लक्ष बनवून त्यांना लुबाडण्याचा मनसुबा आखत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.वणी शहराचा विकास (क्षेत्रफळाचा) झपाट्याने होत आहे. गेल्या १० वर्षांत शहराचे आकारमान व लोकसंख्या यात कमालीची वाढ झाली आहे. शर दिवसेंदिवस वाढत आहे, फुगत आहे. आता शहरात जागा नसल्याने जुन्या शहराच्या सभोवताल ले-आऊटचे अक्षरश: पेव फुटले आहे. शहरात घर बांधणीसाठी भूखंड उरले नसल्याने आता मानवी वस्त्या शहराबाहेर तयार होत आहे. त्यामुळे शहरालगतच्या शेतजमिनींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.शहरालगतच्या शेतजमिनीवर बिल्डरांचे रंगीबेरंगी झेंडे उभे होत आहे. कित्येक ठिकाणी तर शेतीचे अकृषकीकरण न करतानाच प्लॉट पाडून ग्राहकांच्या मस्तकी मारले जात आहे. मात्र त्या ले-आऊटमध्ये सोयीसुविधांचा अभाव निर्माण होत असल्याने नागरिक फसवले जात असल्याच्या तक्रारीसुद्धा सतत वाढतच आहे. परिणामी भविष्यात शहराचा पुन्हा विस्तार झाल्यास सार्वजनिक सुविधांसाठी जागा शिल्लक राहात नसल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने वणी शहराचा विकास आराखडा तयार करून नगरपरिषदेकडे पाठविला आहे. या विकास आराखड्याला व्यापक प्रसिद्धी देऊन नागरिकांकडून आक्षेप मागविले आहे. विकास आराखड्याला मात्र नगरपरिषदेकडून प्रसिद्धी दिली गेली काय, हे शहरातील बहुसंख्य नागरिकांना माहितच नाही. या विकास आराखड्याच्या मुद्यावरच येथील नगराध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. शहरालगतचे कोणते शेत सर्व्हे नंबर कशासाठी राखीव आहे, हे दर्शविलेले असते. मात्र नागरिकांना हा विकास आराखडा पाहायला मिळतच नाही. यावर आक्षेप घेण्याची मुदतही १ मे २०१६ पर्यंतच असल्याची माहिती आहे. मात्र याचा लाभ घेऊन काही दलाल सक्रिय झाल्याची चर्चा आहे.तुमचा शेत सर्व्हे नंबर या कामासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यावरील आरक्षण हटविण्यासाठी काही खर्च येतो, असे निरोप काही भूखंडधारकांना पाठविले जात असल्याचे समजते. विकास आराखड्यात आरक्षित नसलेल्या भूखंडधारकांना जाळ्यात ओढून विनासायास ‘लक्ष्मीे’चा आशिर्वाद घेण्याचे स्वप्न अनेक दलाल पाहात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. विकास आराखड्यामध्ये शहरात भविष्यात काय-काय उपाययोजनांचे प्रयोजन केले आहे, हे सुजाण नागरिकांना कळणार कसे, असा प्रश्न यामुळे आता विचारला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)आराखडा जाहीर न करण्यात दडले गुपितशासनाचा नगर रचना विभाग प्रत्येक शहराचा दर २० वर्षांंनी विकास आराखडा तयार करते. वणी नगरपरिषदेचा यापूर्वी १९७१ व १९९१ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला होता. आता २०११ मध्ये मंजूर होणारा विकास आराखडा २०१६ मध्ये तयार केला गेला आहे. तो जनतेच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र येथील नगरपरिषद हा विकास आराखडा गुलदस्त्यात का ठेवत आहे, हे सहज समजण्यासारखे आहे. वास्तविक एखाद्याने पैसे भरून विकास आराखड्याची मागणी केली असता, त्यांना माफक शुल्क आकारून त्याची प्रत देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. तरीही मागणी करूनसुद्धा हा विकास आराखडा उपलब्ध करून दिला जात नाही. यात मोठे गुपीत दडले आहे.