शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

‘मिनी मंत्रालयात’ अखेर महाविकास आघाडी ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. सत्तेचा हाच पॅटर्न राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला आहे. यामुळे राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समित्या एवढेच नव्हे तर सहकार क्षेत्रातसुद्धा सत्तेचे नवे समीकरण नावारुपास येणार आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा अध्यक्ष : भाजप जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण बसविताना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी कायम ठेवण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेच्या बाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत.राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. सत्तेचा हाच पॅटर्न राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला आहे. यामुळे राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समित्या एवढेच नव्हे तर सहकार क्षेत्रातसुद्धा सत्तेचे नवे समीकरण नावारुपास येणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजप-शिवसेना व काँग्रेसची सत्ता आहे. सुरुवातीची दोन वर्षे सेनेच्या सर्वाधिक जागा असूनही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून सेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. परंतु आता नव्या समीकरणात भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गात आणि त्यातही महिलेसाठी राखीव आहे. शिवसेना (२०), काँग्रेस (११ + १) आणि राष्ट्रवादी (११) यांची महाआघाडी स्थापन झाल्यास एकूण ४३ संख्याबळ जुळते आणि सत्ता स्थापनेसाठी ते पुरेसे आहे. राज्यातील सत्तेचा पॅटर्न कायम राहिल्यास अध्यक्षपद शिवसेनेकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि किमान दोन सभापती काँग्रेसकडे असा जागा वाटपाचा फार्म्युला राहू शकतो. परंतु राष्ट्रवादीपेक्षा आपली एक जागा अधिक असल्याचे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष पदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.भाजपचे सर्वत्रच नुकसानजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी पाच जागा भाजपने खेचून आणल्या आहेत. दोन नवे चेहरे निवडून आणत पाचही जागा भाजपने कायम राखल्या. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली असती तर भाजपला किमान दोन कॅबिनेट जिल्ह्याला मिळाले असते. जुन्या सरकारमध्ये भाजपकडे जिल्ह्यात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते. परंतु आता विरोधात बसावे लागत असल्याने भाजपचे मंत्री पदाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच जागा असूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ भाजपवर आली आहे. जिल्हा परिषदेमध्येसुद्धा भाजपला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका वठवावी लागण्याची चिन्हे आहे. शिवसेनेने खालोखाल १८ जागा भाजपच्या आहेत. दोन वर्ष भाजपने सेनेला सत्तेबाहेर ठेवले. आता सेनेच्या नेतृत्वातील महाआघाडी भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेबाहेर ठेवणार आहे. यानिमित्ताने राजकीय हिशेब येथेच चुकता होणार असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद