शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अमृतच्या कंत्राटदारामुळे शहराचा विकास गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:43 IST

हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘विकास’ गोत्यात आला आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांचे बेहाल : ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’, वाहतूकही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘विकास’ गोत्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलेली प्रामुख्याने रस्त्याची कामे थांबली आहेत.दोन वर्षांपूर्वी अमृत योजनेच्या कामाला धूमधडाक्यात सुरुवात झाली. योजना पूर्ण करण्याचा कालावधी जवळ आला आहे. या कामाची आजची गती पाहता निर्धारित कालावधीत योजना पूर्ण होणार नाही हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र या योजनेची शहरात होत असलेली कामे इतर कामांसाठी मोठा खोडा ठरत आहे. खोदकामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. खड्डे, धूळ यामुळे लोक त्रस्त आहेत. रस्ते चांगले करण्यासाठी ‘अमृत’ची पाईपलाईन टेस्टींग व्हायची आहे, काम अपूर्ण आहे या व इतर प्रकारची कारणे सांगितली जात आहेत. यात बऱ्याच अंशी तथ्यही आहे. गोदणी रोड ते वीर वामनराव चौकापर्यंत प्राधिकरणाचे पाईप टाकून आठ ते दहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. अलीकडे कुठे या रस्त्याच्या दुरुस्तीला हात लागला. एवढे दिवस लोटल्यानंतर अमृतच्या कंत्राटदाराने ओके दिले नाही. आता तर मार्इंदे चौकात भलेमोठे खोदकाम करण्यात आले. पाईप टाकल्यानंतर काँक्रिटचे काम सुरू केले. या कामासाठी हा संपूर्ण मार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय शिवाजी गार्डन मार्ग, गोदामफैल, शास्त्रीनगर, चर्च ते चांदणी चौक रोड, हनुमान आखाडा चौक परिसर खोदून ठेवलेला आहे.लोकप्रतिनिधींना ‘विकास’ करायचा आहे. अनेक भागात भूमिपूजन झाले. या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात अमृतचा खोडा असल्याची ओरड केली जात आहे. एवढ्या मोठ्या योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही, ही साधार शंका व्यक्त केली जात आहे.नवीन रस्त्यांना धोकायवतमाळातील तहसील चौक ते हनुमान आखाडा चौकापर्यंत अमृतची पाईपलाईन वर्षभरापूर्वी टाकण्यात आली. बेंबळाचे पाणी आले नसले तरी या पाईपलाईनमधून मात्र पाणी वाहात आहे. हा चमत्कार शोधण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अजूनतरी यश आलेले नाही. तहसील चौकात असलेल्या सांडपाण्याच्या नालीतील पाणी लिकेजमधून शिरत असावे असा अंदाज बांधून शोध घेण्याचा प्रयत्नही फसला. आणखी शोधाचे अनेक प्रयत्न यासाठी होणार आहे. हा संपूर्ण रस्ता दीड-दोन महिन्यांपूर्वी गुळगुळीत करण्यात आला. ‘अमृत’चे लिकेज शोधण्यासाठी या रस्त्याचे बेहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.