शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांचे डिटेक्शन २५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे. खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते.

ठळक मुद्देवर्षभरात ५७ खून : १५ अग्निशस्त्र व १३६ काडतूस जप्त, गुन्ह्यांचा आलेख नियंत्रणात असणारी आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्षभरात जिल्ह्यात घरफोडीच्या ९०३ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २९ गुन्हे कमी झाले आहे. मात्र यातील डिटेक्शनचे प्रमाण केवळ २४.९१ टक्के इतकेच आहे. खुनांच्या घटनांमध्ये दोनने वाढ झाली असून वर्षभरात ५७ खून झाले. विनयभंगाच्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. तर बलात्काराचे गुन्हे वाढले आहे.जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे.खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते. प्रतिबंधात्मक कारवाईत मागील वर्षीच्या तुलनेत कामगिरी वाढली आहे. १०७ कलमानुसार १३ हजार ९१६ जणांविरुद्ध कारवाई झाली. सीआरपीसी ११० नुसार ७५३ जणांवर कारवाई केली. महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १२२ नुसार १०१ जणांवर कारवाई झाली. एमपीडीए अंतर्गत सात जणांवर कारवाई केली आहे. मागील वर्षी सहा जणांना एमपीडीएत टाकण्यात आले होते. हत्यार अधिनियमांतर्गत यावर्षी सात पिस्टल व आठ देशीकट्टे असे ११ अग्नीशस्त्र जप्त केले. यात २३ आरोपी असून १३६ जीवंत काडतूस जप्त केले आहे. धारदार शस्त्राच्या ७९ केसेस केल्या असून १३७ आरोपींकडून ५४ तलवारी, ४८ चाकू व चार सत्तूर जप्त केले आहे.दारूबंदी व जुगार कारवाईची सर्वाधिक प्रकरणेदारुबंदी कायद्याखाली पाच हजार २१ गुन्हे नोंद झाले. तर जुगार कायद्यांतर्गत एक हजार ८९४ गुन्हे दाखल केले. दारूबंदी कायद्यात चार कोटी ४४ लाख दोन हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार कायद्यांतर्गत एक कोटी ४७ लाख ८९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.वर्षभरात ९५ गुन्हेगार तडीपारप्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत १६ हजार २६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये ९५ जणांना तडीपार करण्यात आले. तर सात जणांवर एमपीडीएची कारवाई केली.गुन्हे दोषसिद्धीत जिल्हा ‘टॉपटेन’मध्येदाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एकूण खटल्यांपैकी ४३ टक्के प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. या कामगिरीने जिल्हा राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ठ झाला आहे. सीसीटीएनएसप्रणालीमध्ये जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय लोकसभा, विधानसभा निवडणूक, महत्वांच्या व्यक्तीचे दौरे, सभा, सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक