शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

ठराव होऊनही करंजीचे कर्मचारी जागीच

By admin | Updated: September 29, 2016 01:17 IST

जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले.

वाई केंद्र बंदच : आरोग्य समिती झाली हतबलयवतमाळ : जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले. मात्र अद्याप सर्व कर्मचारी करंजी येथेच असून वाई केंद्र सुरू झाले नाही. वारंवार वरिष्ठांशी संपर्क साधूनही केंद्र बंद असल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य समिती हतबल झाली आहे.करंजी रोड येथे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परिणामी तेथील आरोग्य केंद्र लगतच्या वाई येथे हलविण्याचा ठराव समितीने पारित केला. त्यानुसार वाई येथील एका समाज मंदिरात केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र शासन वाई येथे स्वतंत्र वास्तू नसल्याने कर्मचारी पाठविण्यास तयार नाही. परिणामी वाई येथील केंद्र अद्याप बंद असून सर्व कर्मचारी करंजी येथेच बसून असतात. त्यामुळे आरोग्य समिती हतबल झाली आहे.आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बुधवारी समितीची बैठक झाली. त्यावेळी हे सत्य उजागर झाले. बैठकीत आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २६ जागा रिक्त आहे. नव्याने १४ वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात येणार असून त्यापैकी प्रत्यक्षात किती रूजू होतात, यावरही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरची लागण झाली असून कोणतीही साथ नसल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकाम दुरुस्तीला बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यासाठी विविध शिर्षकांखाली निधीची तरतूद करण्यासंदर्भातही चर्चा झाली. (शहर प्रतिनिधी)वेगावचे केंद्र दोन खोलीतमारेगाव तालुक्यातील वेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूचे बांधकाम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. तूर्तास तेथे दोन खोल्यांमध्ये केंद्राचे कामकाज सुरू आहे. वेगावप्रमाणेच वाई येथे समाज मंदिरामध्ये केंद्र सुरू करावे, असा ठरावही पारित करण्यात आला. वारंवार ठराव पाठवून आरोग्य विभाग दाद देत नसल्याने खुद्द सभापतीही जेरीस आले आहे. त्याचप्रमाणे उपकेंद्र बांधकामासाठी शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याबद्दलही सभापती नरेंद्र ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.