शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा

By admin | Updated: November 6, 2016 00:26 IST

परतीच्या पावसातून बचावलेल्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली असून,

भाव गडगडले : मळणी यंत्रातून काढणी महागलीपुसद : परतीच्या पावसातून बचावलेल्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, बाजारातील भाव पाहून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच पडत आहे. गडगडलेले भाव आणि मळणी यंत्राचे वाढलेले दर यामुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. पुसद तालुक्यात गत काही वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनकडे वळला आहे. कपाशीचा लागवड खर्च आणि उत्पन्न कमी यामुळे तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली. सुरूवातीला दमदार पावसाने सोयाबीन चांगले बहरले. मात्र सोयाबीन ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाने महिनाभर दडी मारली. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सोयाबीन जगविले. यंदा मुबलक पीक होईल अशी आशा होती. त्याचवेळी परतीच्या पावसाने दगा दिला. अनेकांच्या शेतातील सोयाबीनला कोेंब फुटले, अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन येऊ लागला. मात्र सोयाबीनला बाजारभाव कमी मिळू लागला. गत वर्षी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला सोयाबीनचा भाव यंदा अडीच हजार रुपयावर आला. त्याच सोयाबीन काढणीसाठी लागणाऱ्या मळणी यंत्राचे भाव वाढले आहे. मजुरांची मजुरी लाव-लागवड खर्च आदींचा हिशेब लावल्यास शेतकऱ्याच्या हाती काहीही उरत नाही. दुसरीकडे कपाशीवर आशा असताना आता लाल्याचे आक्रमण झाले आहे. मुबलक पाणी होऊनही यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळाचेच सावट आहे. दरवर्षी चांगली सुगी होईल अशा आशेत असलेल्या शेतकऱ्यांची पुसद तालुक्यात घोर निराशा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)