शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

इच्छामरण आंदोलन

By admin | Updated: December 1, 2015 06:34 IST

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने भर टाकण्याचेच काम केले आहे. पीक पैसेवारी, शेतमालाचा

यवतमाळ : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने भर टाकण्याचेच काम केले आहे. पीक पैसेवारी, शेतमालाचा भाव, कृषी पंपाचा वीज पुरवठा यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लोकजागृतीच्या मंचाच्या पुढाकारात इच्छामरण आंदोलन केले. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून ती पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी ही प्रेतयात्रा मध्येच अडविल्याने एका सभेनंतर या आंदोलनाची सांगता झाली. शेती आणि शेतकरी या मुद्यावर प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खुद्द पालकमंत्री संजय राठोड यांनी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यातील पीकस्थिती सर्वोत्तम असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६७ टक्के इतकी पीक पैसेवारी काढली. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहीला. आक्षेप घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वत:च्या मतदारासंघासह केवळ आठ तालुक्यातील पीक पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी काढावयास लावली. त्यामुुळे उर्वरित आठ तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. पालकमंत्री पीकस्थिती उत्तम असल्याचे सांगत असतानाच नेर तालुक्यात दोन हजार हेक्टरवरचे सोयाबीन काढलेच नाही. शेंगा व दाने नसल्याने या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरविला. सततच्या नापिकीमुळे उमरखेड तालुक्यात दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री राठोड यांनी शेतकरी कुटुंबाला भेट देण्याऐवजी त्यांच्या मतदारसंघात संगीतरजनीचे आयोजन केले. यावरून पालकमंत्र्यांची बेजबाबदारी दिसून येते. यंत्रणेला शेतकरीहितासाठी राबविण्याऐवजी दडपशाहीचे धोरण राबवित असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेचे नेते मराठवाड्यात शेतकरी कुटुंबाची सांत्वना करत असतानाच शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी पुढे येण्याचे सौजन्य दाखवित नाही. उलट आंदोेलन होऊ नये यासाठी जमाबंदी आदेश लागू केला. जिल्हा प्रमुखाकडून पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री त्यांच्या सत्तेचा वापर हा शेतकरीहितासाठी नव्हे तर, त्यांचा आवाज दडपण्यासाठी, न्याय्य मागण्यांसाठीचे आंदोलन चिरडण्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. आझाद मैदान येथून आंदोलनाला सुरूवात झाली. ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा बसस्थानक चौक, दत्त चौक आणि नंतर तिवारी चौकात पोहोचली. हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांसोबतच शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आंदोलकांनी तिवारी चौकातच सभा घेऊन आंदोलनाची सांगता केली. या आंदोलनासाठी लोकजागृती मंचाचे देवानंद पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, घनश्याम अत्रे, चंद्रशेखर चौधरी, सिंकदर शहा, हेमंत कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)