शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

खरडीच्या मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: March 23, 2015 00:04 IST

अडाण नदीकाठावरील शेतं २०१२ च्या महापुरामुळे वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

घाटंजी : अडाण नदीकाठावरील शेतं २०१२ च्या महापुरामुळे वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मदत देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. यात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेदभाव केला. चुकीचा सर्वे करून खरे नुकसानग्रस्त मदतीपासून दूर ठेवण्यात आले. गेली तीन वर्षांपासून मदतीसाठी संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरिकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची याचना केली आहे. कोपरी (कापसी) या गावातील शेतकरी आणि नागरिकांची ही व्यथा आहे. २०१२ मध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले २होते. जिकडेतिकडे पाणीच पाणी होते. अनेक घरांना पुराचा विळखा पडला होता. संपूर्ण शेत पाण्याखाली आल्याने शेती उत्पादन तर दूर माती वाहून गेल्याने शेतजमीन बज्जड झाली. या सर्व नुकसानीचा सर्वे करण्यात आला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेलच असे ठामपणे सांगितले होते. महापुरात खरडून गेलेल्या शेताचा सर्वे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र यात शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावेच मदतीच्या यादीत नाही. नुकसान झालेल्या लोकांची नावे यात समाविष्ठ करून त्यांना लाभ देण्यात आला, असा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावातून वाहणारी अडाण नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. प्रत्यक्ष पाहणी केल्यास कोणत्या शेतातील नुकसान झाले हे स्पष्ट होते. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक या बाबी टाळल्या. प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि खोट्या लाभार्थ्यांची देयके थांबविण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. सरपंच बेबी तलांडे, उत्तम बिबेकार, विनोद मुनगीनवार, अनंता सोनटक्के, सुनील सोनटक्के, सुरेंद्र कटकमवार, राजेंद्र कटकमवार, सखाराम मुनगीनवार, लीलाबाई डफळे आदींनी निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)ेनेर तालुक्यात मदतीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक शासनाने जाहीर केलेली अल्पशीही मदत देण्यासाठी तालुका महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे तलाठ्यांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचा जाच सुरू आहे. शेतकऱ्यांची दैना सुरू असताना सुरू असलेला हा प्रकार प्रशासनाने थांबवावा अशी मागणी होत आहे. दुष्काळाच्या मदतीचे वाटप तालुक्यातील महसूल यंत्रणेकडून होत आहे. यापूर्वी महसूल विभागाने तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांची माहिती, बँक खाते नंबर मागविले होते. तलाठ्यांनी बसल्या जागी शेतकऱ्यांची माहिती आणि बँक खाते क्रमांक टाकल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण शेकडो शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात पोहचलेच नाही. सर्वाधिक प्रकार नेर विभागात आहे. संबंध नसलेल्या बँकेत रक्कम जमा झाल्यावर या बँकेकडून शेतकऱ्याला तलाठ्याचे पत्र आणण्यास सांगितल्या जाते. मात्र काही तलाठी शेतकऱ्यांना फिरवत आहे. काहींकडून चिरीमिरीची मागणी होते. चिचगाव, बाणगाव, खरबी परिसरात या समस्या मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतकऱ्यांचे मदतीच्या यादीत नावेच नाही. नावे टाकण्यासाठी आर्थिक मागणी होत आहे. काही बँका मदतीतून कर्जात कपात करत आहे. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)