शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

यवतमाळ जिल्हा फणफणला : कोरोनापाठोपाठ आता डेंग्यू, मलेरियाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:27 IST

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत उपाययोजनेबाबत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

ठळक मुद्दे रुग्णालयात रांगा, डेंग्यूचे १९६ रुग्ण; नगरपालिकांचा स्वच्छतेकडे कानाडोळा

यवतमाळ : नगरपालिकांचे पावसाळ्यातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी यवतमाळ शहरासह बहुतांश ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन चिडीचूप असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातील ३८ रुग्ण यवतमाळ शहरातील आणि मागास वस्त्यांमधील असल्याचे पुढे आले आहे. हा उद्रेक वाढण्यामागे अस्वच्छता कारणीभूत ठरली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यवतमाळ शहरातील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये हा उद्रेक माेठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

भारतनगर, चमेडियानगर, अंबिकानगर, तलाव फैल, गवळीपुरा, पंचशील चाैक, पावर हाऊस, धोबीघाट, अशोकनगर, इंदिरानगर, गोदाम फैल, वंजारी फैल, उमरसरा आणि नागरी वस्त्यांमध्ये हा उद्रेक पाहायला मिळतो आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत.

चिकनगुनियाचे आढळले ६ रुग्ण

काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया आजाराने जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते. आता डेंग्यूसोबत चिकनगुनिया आजारही आपले डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. अस्वच्छतेतून पसरलेला हा आजार डासांच्या उपद्रवाने वाढल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. यासोबत नेर आणि वटफळीमध्ये मलेरियाचे २ रुग्ण आढळले आहेत. शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अशा प्रकारचा उद्रेक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही.

खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा

जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येतील सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या डेंग्यूमध्ये पाहायला मिळाली आहे. गतवर्षी डेंग्यूचे १२५ रुग्ण होते. यावर्षी हा आकडा १९६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. विजय आकोलकर यांनी सांगितले.