शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

यवतमाळ जिल्हा फणफणला : कोरोनापाठोपाठ आता डेंग्यू, मलेरियाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:27 IST

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत उपाययोजनेबाबत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

ठळक मुद्दे रुग्णालयात रांगा, डेंग्यूचे १९६ रुग्ण; नगरपालिकांचा स्वच्छतेकडे कानाडोळा

यवतमाळ : नगरपालिकांचे पावसाळ्यातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी यवतमाळ शहरासह बहुतांश ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन चिडीचूप असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातील ३८ रुग्ण यवतमाळ शहरातील आणि मागास वस्त्यांमधील असल्याचे पुढे आले आहे. हा उद्रेक वाढण्यामागे अस्वच्छता कारणीभूत ठरली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यवतमाळ शहरातील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये हा उद्रेक माेठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

भारतनगर, चमेडियानगर, अंबिकानगर, तलाव फैल, गवळीपुरा, पंचशील चाैक, पावर हाऊस, धोबीघाट, अशोकनगर, इंदिरानगर, गोदाम फैल, वंजारी फैल, उमरसरा आणि नागरी वस्त्यांमध्ये हा उद्रेक पाहायला मिळतो आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत.

चिकनगुनियाचे आढळले ६ रुग्ण

काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया आजाराने जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते. आता डेंग्यूसोबत चिकनगुनिया आजारही आपले डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. अस्वच्छतेतून पसरलेला हा आजार डासांच्या उपद्रवाने वाढल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. यासोबत नेर आणि वटफळीमध्ये मलेरियाचे २ रुग्ण आढळले आहेत. शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अशा प्रकारचा उद्रेक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही.

खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा

जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येतील सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या डेंग्यूमध्ये पाहायला मिळाली आहे. गतवर्षी डेंग्यूचे १२५ रुग्ण होते. यावर्षी हा आकडा १९६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. विजय आकोलकर यांनी सांगितले.