शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा परिसरातील गावांत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: October 18, 2014 23:01 IST

तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेर : तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच ब्राह्मणवाडा येथील ३० वर्षीय महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र अद्याप डेंग्यूसदृश आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले नाही.तालुक्यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) या गावाला हागणदारीमुक्ती निर्मल ग्राम योजना, हरियाली योजना व तंटामुक्त पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात या गावाची स्थिती दयनीय असून अस्वच्छतेचा साम्राज्य आहे. जागोजागी अस्वच्छ पाण्याचे डबके साचले असून ज्या विहिरीतून नळयोजनेला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. भारनियमनाचे व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याचे कारण सांगत टाकीत साठवून ठेवलेले पाणी गावकऱ्यांना प्यावे लागते. पाण्याच्या टाकीत कचरा साचला असून ग्रा.पं.ने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. एवढे पुरस्कार मिळूनही सदर गाव विकासापासून कोसो दूर असून स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहे. गावातील दुर्गा अमृत चर्जन (३०) हिला काही दिवसांपूर्वी डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले होते. यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिला नऊ महिन्याचे बाळ असून मातेच्या निधनामुळे सदर बालक पोरके झाले. अत्यंत शोकाकूल वातावरणात दुर्गा चर्जन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राह्मणवाडा येथील मनोज संतोष जाधव (६), प्रणय संजय कांबळे (१०), तेजस संजय कांबळे (१२), विनोद भीमराव राठोड (५) रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच माणिकवाडा येथेही ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा सदोष असल्याने आशिष अविनाश रामटेके (९) व इतर अनेकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. परिसरातील अनेक गावांवर डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मात्र या आजाराने तालुक्यातील नागरिक भयभीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. असे असले तरी अद्याप आजार नियंत्रणात आरोग्य यंत्रणेला यश आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)