शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ‘डीपीसी’बाहेर निदर्शने

By admin | Updated: February 1, 2016 02:14 IST

दुष्काळग्रस्त जिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय.

पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : नारेबाजीने पोलिसांची तारांबळयवतमाळ : दुष्काळग्रस्त जिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाहेर जोरदार निदर्शने केली. अचानक आलेल्या या मोर्चाने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पालकमंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी नारे लावत बैठकीत शिरण्याचा प्रयत्नही केला. जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना पाच लाख वाटायचे कसे याचा हिशेब पालकमंत्री संजय राठोड यांनी द्यावा, बैठका घेण्याचे नाटक करू नये, असे म्हणत, काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभेकडे आले. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने एक-दोनच्या संख्येने बचत भवन परिसरात गोळा झाले. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, यवतमाळ शहर अध्यक्ष चंदू चौधरी, प्रदीप डंभारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन मिर्झापुरे, शुभम लांडगे, दिनेश गोगरकर, अरुण ठाकूर, उमेश इंगळे, शबीर बेग, अरुण ठाकूर, कृष्णा पुसनाके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस कुमक येईपर्यंत त्यांना चर्चेतच गुंतवून ठेवले. शेवटी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी आंदोलकांना पोलिसांच्या वाहनामध्ये डांबून स्थानबद्ध केले. सायंकाळी या आंदोलकांची सुटका करण्यात आली. मात्र अचानक आलेल्या धडक मोर्चामुळे नियोजन समितीची बैठक काही काळासाठी प्रभावित झाली. नंतर दार बंद करून सभा पूर्ववत घेण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)