शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी तोकडे अनुदान

By admin | Updated: November 13, 2014 23:10 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते.

नांदेपेरा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते. शौचालयासाठी केवळ १२ हजारांचे अनुदान असून गगनाला भिडलेल्या महागाईत कमी पैशात शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. अस्वच्छता हेच अनेक रोगांचे मूळ असते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून राज्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वच्छता राखणाऱ्या गावांना दरवर्षी सन्मानीतही करण्यात येत आहे. गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र गावकऱ्यांना स्वच्छतेचा पूर्णपणे विसर पडतो. स्वच्छता अभियानावर आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम अद्यापही दिसून येत नाही. याबाबत अखेर शासनाकडूनच मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात बहुतांश नागरिकांकडे शौचालय नसल्याने नागरिक गावाच्या बाहेर, एखाद्या खुल्या जागेवर शौचास बसतात, असे दिसून आले. ही बाब शासनाच्या लक्षात आली. तथापि शौचालय बांधकामाचा खर्च अधिक होता. त्यामुळे अखेर शासनाने शौचालय बांधकामासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी वैयक्तीक शौचालय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान वाढती महागाई लक्षात घेता, या अनुदानातून लाभार्थ्यांना शौचालयाचा खड्डाही खोदून घेणे कठीण जात आहे. त्यातच सिमेंट, विटा, रेती, सिट, पाईप, सळाख आदी साहित्य खरेदी करावे लागते. या बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एवढ्या तोकड्या अनुदानातून हे साहित्य खरेदी करताना लाभार्थ्यांची प्रचंड दमछाक होते. त्यात शौचालय बांधणे कठीण होते.एवढ्या तोकड्या अनुदानात शौचालय बाांधणे कठीण असल्याने आता शासनाने हे अनुदान वाढवून देण्याची गरज आहे. जे लाभार्थी सधन असतात, ते जवळचे पैसे टाकून शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात. मात्र ज्या लाभार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते, असे लाभार्थी या तोकड्या अनुदानातून शौचालय बांधूच शकत नाहीत. त्यांच्यासमोर शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेतून लाभार्थ्यांनी शौचालयाचे अपुरे बांधकाम करून ठेवले. उर्वरित बांधकामासाठी त्यांच्याकडे पैसा उरला नाही. त्यामुळे त्यांची शौचालये अपूर्णच आहेत. ती पूर्ण करण्यासाठी वाढीव अनुदानाची गरज आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तारूढ होताच देशात नव्या जोमाने स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच स्वच्छतेचा ज्वर चढल्याचे दिसत आहे. राज्यातही नवीन सरकार आले आहे. आता या स्वच्छता अभियानाला अधिक बळकट करण्यासाठी शौचालय बांधकाकरिता वाढीव अनुदान देण्याची गरज आहे. (वार्ताहर)