शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

शौचालयासाठी तोकडे अनुदान

By admin | Updated: November 13, 2014 23:10 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते.

नांदेपेरा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते. शौचालयासाठी केवळ १२ हजारांचे अनुदान असून गगनाला भिडलेल्या महागाईत कमी पैशात शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. अस्वच्छता हेच अनेक रोगांचे मूळ असते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून राज्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वच्छता राखणाऱ्या गावांना दरवर्षी सन्मानीतही करण्यात येत आहे. गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र गावकऱ्यांना स्वच्छतेचा पूर्णपणे विसर पडतो. स्वच्छता अभियानावर आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम अद्यापही दिसून येत नाही. याबाबत अखेर शासनाकडूनच मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात बहुतांश नागरिकांकडे शौचालय नसल्याने नागरिक गावाच्या बाहेर, एखाद्या खुल्या जागेवर शौचास बसतात, असे दिसून आले. ही बाब शासनाच्या लक्षात आली. तथापि शौचालय बांधकामाचा खर्च अधिक होता. त्यामुळे अखेर शासनाने शौचालय बांधकामासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी वैयक्तीक शौचालय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान वाढती महागाई लक्षात घेता, या अनुदानातून लाभार्थ्यांना शौचालयाचा खड्डाही खोदून घेणे कठीण जात आहे. त्यातच सिमेंट, विटा, रेती, सिट, पाईप, सळाख आदी साहित्य खरेदी करावे लागते. या बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एवढ्या तोकड्या अनुदानातून हे साहित्य खरेदी करताना लाभार्थ्यांची प्रचंड दमछाक होते. त्यात शौचालय बांधणे कठीण होते.एवढ्या तोकड्या अनुदानात शौचालय बाांधणे कठीण असल्याने आता शासनाने हे अनुदान वाढवून देण्याची गरज आहे. जे लाभार्थी सधन असतात, ते जवळचे पैसे टाकून शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात. मात्र ज्या लाभार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते, असे लाभार्थी या तोकड्या अनुदानातून शौचालय बांधूच शकत नाहीत. त्यांच्यासमोर शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेतून लाभार्थ्यांनी शौचालयाचे अपुरे बांधकाम करून ठेवले. उर्वरित बांधकामासाठी त्यांच्याकडे पैसा उरला नाही. त्यामुळे त्यांची शौचालये अपूर्णच आहेत. ती पूर्ण करण्यासाठी वाढीव अनुदानाची गरज आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तारूढ होताच देशात नव्या जोमाने स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच स्वच्छतेचा ज्वर चढल्याचे दिसत आहे. राज्यातही नवीन सरकार आले आहे. आता या स्वच्छता अभियानाला अधिक बळकट करण्यासाठी शौचालय बांधकाकरिता वाढीव अनुदान देण्याची गरज आहे. (वार्ताहर)