शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

शौचालयासाठी तोकडे अनुदान

By admin | Updated: November 13, 2014 23:10 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते.

नांदेपेरा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत तोकडे अनुदान देण्यात येते. शौचालयासाठी केवळ १२ हजारांचे अनुदान असून गगनाला भिडलेल्या महागाईत कमी पैशात शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. अस्वच्छता हेच अनेक रोगांचे मूळ असते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून राज्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वच्छता राखणाऱ्या गावांना दरवर्षी सन्मानीतही करण्यात येत आहे. गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र गावकऱ्यांना स्वच्छतेचा पूर्णपणे विसर पडतो. स्वच्छता अभियानावर आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम अद्यापही दिसून येत नाही. याबाबत अखेर शासनाकडूनच मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात बहुतांश नागरिकांकडे शौचालय नसल्याने नागरिक गावाच्या बाहेर, एखाद्या खुल्या जागेवर शौचास बसतात, असे दिसून आले. ही बाब शासनाच्या लक्षात आली. तथापि शौचालय बांधकामाचा खर्च अधिक होता. त्यामुळे अखेर शासनाने शौचालय बांधकामासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी वैयक्तीक शौचालय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान वाढती महागाई लक्षात घेता, या अनुदानातून लाभार्थ्यांना शौचालयाचा खड्डाही खोदून घेणे कठीण जात आहे. त्यातच सिमेंट, विटा, रेती, सिट, पाईप, सळाख आदी साहित्य खरेदी करावे लागते. या बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एवढ्या तोकड्या अनुदानातून हे साहित्य खरेदी करताना लाभार्थ्यांची प्रचंड दमछाक होते. त्यात शौचालय बांधणे कठीण होते.एवढ्या तोकड्या अनुदानात शौचालय बाांधणे कठीण असल्याने आता शासनाने हे अनुदान वाढवून देण्याची गरज आहे. जे लाभार्थी सधन असतात, ते जवळचे पैसे टाकून शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात. मात्र ज्या लाभार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते, असे लाभार्थी या तोकड्या अनुदानातून शौचालय बांधूच शकत नाहीत. त्यांच्यासमोर शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेतून लाभार्थ्यांनी शौचालयाचे अपुरे बांधकाम करून ठेवले. उर्वरित बांधकामासाठी त्यांच्याकडे पैसा उरला नाही. त्यामुळे त्यांची शौचालये अपूर्णच आहेत. ती पूर्ण करण्यासाठी वाढीव अनुदानाची गरज आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तारूढ होताच देशात नव्या जोमाने स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच स्वच्छतेचा ज्वर चढल्याचे दिसत आहे. राज्यातही नवीन सरकार आले आहे. आता या स्वच्छता अभियानाला अधिक बळकट करण्यासाठी शौचालय बांधकाकरिता वाढीव अनुदान देण्याची गरज आहे. (वार्ताहर)