शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

घाटंजी : राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी पुणे येथील समाज ...

घाटंजी : राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर २२ सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत गेल्या ७० वर्षांपासून १०० टक्के अनुदानित आणि शासन मान्यता असलेली अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह योजना चालविली जाते. शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व जमातींच्या आश्रमशाळा, विमुक्त जाती व जमातीच्या आश्रमशाळा, अंध व अपंगांच्या शाळा व संलग्न वसतिगृहे यासह विविध प्रकारच्या योजना नव्याने सरकारने अमलात आणल्या. नवीन योजनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू केली.

परंतु गेल्या ७० वर्षांपासून अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. उलट वेतन श्रेणीपासून त्यांना वंचित ठेवले. २००३ आणि २०१३ मध्ये कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत सामावून घ्यावे म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत वेतन श्रेणीचा प्रस्ताव सादर झाला. मात्र, केवळ राजकीय श्रेयवादामुळे तत्कालीन सरकारने वसतिगृह कर्मचाऱ्यांना मानधनात तुटपुंजी वाढ देऊन तोंडाला पाने पुसली.

विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केलेल्या योजनांना अनुदानित करून त्या योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू केली जात आहे. परंतु फक्त मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी २४ तास काम करणाऱ्या वसतिगृह कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय खात्याकडून तुटपुंजे मानधन ऊन त्यांची थट्टा केली जात आहे. त्यामुळे पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर आमरण कर्मचारी प्रदीप वाक्पैजन यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.

बॉक्स

आत्तापर्यंत पाच कर्मचाऱ्यांची आत्महत्या

कमी वेतन श्रेणीमुळे आत्तापर्यंत राज्यातील पाच वसतिगृह कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यात विश्वंभर कांबळे (लातूर), प्रकाश बोरकर (परभणी), भरत राजुरे (लातूर), भाऊ गोतावळे (उस्मानाबाद), श्रीराम शहाणे (नांदेड) यांचा समावेश आहे. तरीही शासनाला जाग आली नसल्याचा आरोप प्रदीप वाक्पैजन यांनी केला आहे.