शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आर्णी तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2015 02:42 IST

राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला.

आमदारांना निवेदन : शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाटआर्णी : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला. आर्णी तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट असल्याने या तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी आमदार ख्वाज बेग यांच्यासह प्रभारी तहसीलदार सुधीर पवार यांना दिले.शेतीची परिस्थिती यंदा अत्यंत वाईट असतानाही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविणे ही गंभीर बाब आहे.तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा उतारा दोन-तीन क्विंटलच्या वर नाही. उत्पादन खर्चही भरून निघू शकत नाही. कपाशीची स्थितीही अशीच आहे. झाड हिरवे आहे, उंच आहे म्हणजे उत्पादन वाढेल असा समज करून पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविणे ही मनमानी आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत आर्णी तालुका वगळल्याने शेतकरी निराश झाले आहे. जिल्ह्यातील पिंप्री बुटी येथे आले असता मुख्यमंत्र्यांनी पीक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादीतून संपूर्ण जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सातबारा कोरा करून कर्जमाफी करावी, वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळाव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी रवींद्र नालमवार, हरीष कुडे, सुनील राठोड, चिराग शाह, फिरोज बेग मिर्झा, रवी राठोड, मनोज माघाडे, सुहेल पटेल, लक्ष्मण राठोड, परमेश्वर कांबळे, हारुन शाह, परवेज बेग मिर्झा एजास सैयद, यासीन नागनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)