शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

आर्णी तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2015 02:42 IST

राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला.

आमदारांना निवेदन : शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाटआर्णी : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला. आर्णी तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट असल्याने या तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी आमदार ख्वाज बेग यांच्यासह प्रभारी तहसीलदार सुधीर पवार यांना दिले.शेतीची परिस्थिती यंदा अत्यंत वाईट असतानाही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविणे ही गंभीर बाब आहे.तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा उतारा दोन-तीन क्विंटलच्या वर नाही. उत्पादन खर्चही भरून निघू शकत नाही. कपाशीची स्थितीही अशीच आहे. झाड हिरवे आहे, उंच आहे म्हणजे उत्पादन वाढेल असा समज करून पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविणे ही मनमानी आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत आर्णी तालुका वगळल्याने शेतकरी निराश झाले आहे. जिल्ह्यातील पिंप्री बुटी येथे आले असता मुख्यमंत्र्यांनी पीक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादीतून संपूर्ण जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सातबारा कोरा करून कर्जमाफी करावी, वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळाव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी रवींद्र नालमवार, हरीष कुडे, सुनील राठोड, चिराग शाह, फिरोज बेग मिर्झा, रवी राठोड, मनोज माघाडे, सुहेल पटेल, लक्ष्मण राठोड, परमेश्वर कांबळे, हारुन शाह, परवेज बेग मिर्झा एजास सैयद, यासीन नागनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)