शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

आर्णी तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2015 02:42 IST

राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला.

आमदारांना निवेदन : शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाटआर्णी : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला. आर्णी तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट असल्याने या तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी आमदार ख्वाज बेग यांच्यासह प्रभारी तहसीलदार सुधीर पवार यांना दिले.शेतीची परिस्थिती यंदा अत्यंत वाईट असतानाही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविणे ही गंभीर बाब आहे.तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा उतारा दोन-तीन क्विंटलच्या वर नाही. उत्पादन खर्चही भरून निघू शकत नाही. कपाशीची स्थितीही अशीच आहे. झाड हिरवे आहे, उंच आहे म्हणजे उत्पादन वाढेल असा समज करून पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविणे ही मनमानी आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत आर्णी तालुका वगळल्याने शेतकरी निराश झाले आहे. जिल्ह्यातील पिंप्री बुटी येथे आले असता मुख्यमंत्र्यांनी पीक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादीतून संपूर्ण जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सातबारा कोरा करून कर्जमाफी करावी, वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळाव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी रवींद्र नालमवार, हरीष कुडे, सुनील राठोड, चिराग शाह, फिरोज बेग मिर्झा, रवी राठोड, मनोज माघाडे, सुहेल पटेल, लक्ष्मण राठोड, परमेश्वर कांबळे, हारुन शाह, परवेज बेग मिर्झा एजास सैयद, यासीन नागनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)