महासंघाचा आरोप : कारवाईची मागणीवणी : शिक्षक कल्याण निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी येथील पंचायत समितीकडून विलंब होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.येथील पंचायत समितीअंतर्गत कार्यरत सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांची दरमहा वेतनाद्वारे रक्कम कपात केली जाते. कपात केलेली रक्कम शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर कपात निधीचा धनादेश जिल्हा परिषदेकडे पाठविणे गरजेचे आहे. मात्र शिक्षकांची कपात केलेली शिक्षक कल्याण निधी रक्कम गेल्या मे २०१५ पासून पाठविण्यात आलेली नाही, असा आरोप महासंघाने केला आहे.जिल्हा कार्यालयाने निधी पाठविण्यासंदर्भात तीन स्मरणपत्र दिले आहे. त्या पत्रांचा उपयोग लेखा विभागातील रोखपाल व अन्य कर्मचाऱ्यांनी कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी केल्याचा आरोपही संघटनेने केला. शिक्षक कल्याण निधी धनादेश पाठविण्यास येथील लेखा विभागातील कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. परिणामी पंचायत समितीअंतगतर्गत कार्यरत सर्व शिक्षक प्राप्त कल्याण निधीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी पंचायत समितीची राहिल व रक्कम न मिळाल्यास जिल्हा कार्यालयात धनादेश न पाठविणाऱ्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम अदा करावी, अशी मागणी महासंघाचे राज्य कोषाध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निरे आदींनी आदींनी निवेदनातून केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शिक्षक कल्याण निधी पाठविण्यास विलंब
By admin | Updated: May 6, 2016 02:25 IST