शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दीडशेवर कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती अखेर रद्द

By admin | Updated: May 20, 2014 00:00 IST

कार्यमुक्तीसाठी सीईओंची विभाग प्रमुखांना तंबी यवतमाळ : बदली झाल्यानंतर मुख्यालयी प्रतिनियुक्ती मिळवून अनेकांनी आपले बस्तान जिल्हा परिषदेत बसवीले होते.

जिल्हा परिषद : कार्यमुक्तीसाठी सीईओंची विभाग प्रमुखांना तंबी यवतमाळ : बदली झाल्यानंतर मुख्यालयी प्रतिनियुक्ती मिळवून अनेकांनी आपले बस्तान जिल्हा परिषदेत बसवीले होते. या सर्व कर्मचार्‍यांची तत्काळ उचलबांगडी करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे. विविध विभागात कार्यरत दीडशेच्यावर कर्मचार्‍यांना आता आपले बस्तान गुुंडाळावे लागणार आहे. यामुळे प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांत खळबळ उडली आहे. मुख्यालयातून बदली झाल्यानंतरही नव्या आस्थापनेवर रुजू न होता कर्मचार्‍यांकडून प्रतिनियुक्तीसाठी खटाटोप केला जात होता. अधिकारी, पदाधिकार्‍यांची मर्जी सांभाळून अनेकजण मुख्यालयीच आहे. अशा कर्मचार्‍यांचा मोठ्या प्रमाणात भरणा जिल्हा मुख्यालयी आणि काही पंचायत समितीमध्ये झाला आहे. या कर्मचार्‍यांना कोणीच बिघडवू शकत नाही, अशा अर्विभावात ते वावरत होते. प्रत्येकाने आपला एक गॉडफॉदर तयार केला होता. त्यांच्या पाठबळावर हुकुमत सुरू होती. मध्यंतरीच्या काळात प्रतिनियुक्त कर्मचारी आणि पूर्णवेळ कर्मचारी यांच्यात वारंवार खटके उडत होते. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी मुख्यालयी येऊच नये अशी स्थिती निर्माण केली होती. मुख्यालयी इतर कोणाला काम करता येत नाही, असे चित्र पध्दतशीर पणे निर्माण करण्यात आले होते. याला वरिष्ठ अधिकारी वर्गही भुलला होता. प्रतिनियुक्ती कर्मचार्‍यांच्या भरवशावर कामकाज चालवणारी यवतमाळ जिल्हा परिषद ही एकमेव असावी. हा प्रकार बघून नव्याने आलेल्या कोणत्याही अधिकार्‍यांना धक्काच बसत होता. ही बाब ‘लोकमत’ने वारंवार उजागर केली. याचीच दखल घेवूवन सीईओ मल्लिानाथ कलशेट्टी यांनी प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना तत्काळ मुळ आस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश दिले. या कर्मचार्‍यांना विभाग प्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच बीडीओंनी हे कर्मचारी रूजू झाल्याचा अहवाल द्यावा अशी सूचना दिली आहे. यात दिरंगाई करणार्‍या विभाग प्रमुखाला जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. मूळ आस्थापनेवर रुजू न होणार्‍या प्रतिनियुक्त कर्मचार्‍यांचे वेतन काढण्यात येवू नये, असे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्हा मुख्यालयी पंचायत, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, वित्त, कृषी, समान्य प्रशासन यासह इतर ही विभागात कार्यरत असलेल्या दीडशेच्यावर कर्मचार्‍यांना आता आपले बस्तान गुुंडाळावे लागणार आहे. सीईओंच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचार्‍यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. आता मुख्यालयी आपल्यालाही कामाची चुणूक दाखविण्याची संधी मिळेल असा, विश्वास व्यक्त केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)