शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दारव्हा तालुक्यात सोयाबीन उताऱ्यात घट

By admin | Updated: October 10, 2015 02:00 IST

सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे.

आर्थिक अडचण : १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पन्नावर परिणामदारव्हा : सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली त्यांना एकरी दोन ते पाच पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. ओलित केलेल्या अपवादात्मक शेतकऱ्यांचे क्षेत्र वगळता जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.यंदा मृग नक्षत्रातच मान्सूनचा पाऊस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिला. परंतु जमिनीत असलेल्या ओलाव्याने सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे उगवले तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी पाऊस उशिरा येत असल्याने जुलै महिन्यात जांभूळवाही केल्यानंतर पेरणी आटोपली. मागील वर्षी सोयाबीनच्या उताऱ्यात घट झाल्याने यावर्षी तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र घटले असले तरी यंदा जवळपास १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस तयार झाल्याने गत आठवडाभरापासून शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू झाली आहे. कापणीनंतर ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या मळणीयंत्राच्या सहाय्याने पीक काढणी केल्या जात आहे. सोयाबीन काढणीनंतर आर्थिक अडचण भागविण्याकरिता शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.यावर्षी एकरी दोन ते पाच पोते सरासरी सोयाबीनचा उतारा येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय व साधने आहेत अशांनी मध्यंतरीच्या काळात ओलित केल्याने अशा अपवादात्मक शेतकऱ्यांना एकरी सात पोते उतारा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना जमिनीचा स्तर पाहता ओलितानंतरही फारसा उत्पन्नात फरक पडला नाही. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक तर परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन पीक वाळल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन दाण्याचा आकार बारीक झाल्याने परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला की उत्पन्नात हमखास घट येते. शेंगामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे आॅक्टोबर हिट यंदा सप्टेंबर महिन्यात जाणवली. अचानक तापमानात वाढ झाली. त्यात रसशोषक किडींनी पानांमधील हरितद्रव्य कमी केल्याने परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन काढणीस आल्याने तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मिळेल त्या भावात शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. (प्रतिनिधी)