शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

दारव्हा तालुक्यात सोयाबीन उताऱ्यात घट

By admin | Updated: October 10, 2015 02:00 IST

सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे.

आर्थिक अडचण : १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पन्नावर परिणामदारव्हा : सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली त्यांना एकरी दोन ते पाच पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. ओलित केलेल्या अपवादात्मक शेतकऱ्यांचे क्षेत्र वगळता जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.यंदा मृग नक्षत्रातच मान्सूनचा पाऊस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिला. परंतु जमिनीत असलेल्या ओलाव्याने सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे उगवले तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी पाऊस उशिरा येत असल्याने जुलै महिन्यात जांभूळवाही केल्यानंतर पेरणी आटोपली. मागील वर्षी सोयाबीनच्या उताऱ्यात घट झाल्याने यावर्षी तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र घटले असले तरी यंदा जवळपास १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस तयार झाल्याने गत आठवडाभरापासून शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू झाली आहे. कापणीनंतर ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या मळणीयंत्राच्या सहाय्याने पीक काढणी केल्या जात आहे. सोयाबीन काढणीनंतर आर्थिक अडचण भागविण्याकरिता शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.यावर्षी एकरी दोन ते पाच पोते सरासरी सोयाबीनचा उतारा येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय व साधने आहेत अशांनी मध्यंतरीच्या काळात ओलित केल्याने अशा अपवादात्मक शेतकऱ्यांना एकरी सात पोते उतारा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना जमिनीचा स्तर पाहता ओलितानंतरही फारसा उत्पन्नात फरक पडला नाही. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक तर परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन पीक वाळल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन दाण्याचा आकार बारीक झाल्याने परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला की उत्पन्नात हमखास घट येते. शेंगामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे आॅक्टोबर हिट यंदा सप्टेंबर महिन्यात जाणवली. अचानक तापमानात वाढ झाली. त्यात रसशोषक किडींनी पानांमधील हरितद्रव्य कमी केल्याने परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन काढणीस आल्याने तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मिळेल त्या भावात शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. (प्रतिनिधी)