शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात सोयाबीन उताऱ्यात घट

By admin | Updated: October 10, 2015 02:00 IST

सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे.

आर्थिक अडचण : १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पन्नावर परिणामदारव्हा : सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली त्यांना एकरी दोन ते पाच पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. ओलित केलेल्या अपवादात्मक शेतकऱ्यांचे क्षेत्र वगळता जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.यंदा मृग नक्षत्रातच मान्सूनचा पाऊस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिला. परंतु जमिनीत असलेल्या ओलाव्याने सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे उगवले तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी पाऊस उशिरा येत असल्याने जुलै महिन्यात जांभूळवाही केल्यानंतर पेरणी आटोपली. मागील वर्षी सोयाबीनच्या उताऱ्यात घट झाल्याने यावर्षी तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र घटले असले तरी यंदा जवळपास १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस तयार झाल्याने गत आठवडाभरापासून शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू झाली आहे. कापणीनंतर ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या मळणीयंत्राच्या सहाय्याने पीक काढणी केल्या जात आहे. सोयाबीन काढणीनंतर आर्थिक अडचण भागविण्याकरिता शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.यावर्षी एकरी दोन ते पाच पोते सरासरी सोयाबीनचा उतारा येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय व साधने आहेत अशांनी मध्यंतरीच्या काळात ओलित केल्याने अशा अपवादात्मक शेतकऱ्यांना एकरी सात पोते उतारा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना जमिनीचा स्तर पाहता ओलितानंतरही फारसा उत्पन्नात फरक पडला नाही. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक तर परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन पीक वाळल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन दाण्याचा आकार बारीक झाल्याने परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला की उत्पन्नात हमखास घट येते. शेंगामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे आॅक्टोबर हिट यंदा सप्टेंबर महिन्यात जाणवली. अचानक तापमानात वाढ झाली. त्यात रसशोषक किडींनी पानांमधील हरितद्रव्य कमी केल्याने परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन काढणीस आल्याने तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मिळेल त्या भावात शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. (प्रतिनिधी)