शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

अंगणवाड्यांना उतरती कळा

By admin | Updated: June 12, 2016 02:13 IST

मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे.

पालकांचा कल नर्सरीकडे : विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटतेयपुसद : मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे. तर दुसरीकडे स्पर्धेच्या युगात आपली पाल्य मागे पडायला नको म्हणून प्रत्येक जण नर्सरीमध्ये दाखल करताना दिसतो. यामुळे तालुक्यातील अंगणवाडींना उतरती कळा लागल्याचे दिसत आहे.बालकांना आरोग्यासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे यासाइी शासनाने गावोगावी अंगणवाड्या सुरू केल्या आहे. परंतु या अंगणवाड्या फक्त बालकांना या खा आणि जा पुरत्याच मर्यादित दिसत आहे. जागरुक पालक आपल्या पाल्यांना अंगणवाडीमध्ये न पाठवता खासगी शाळेमध्ये केजी, नर्सरीसाठी पैसा खर्च करून पाठवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे. शासनाने प्रत्येक गावात अंगणवाडी सुरू केली आहे. या अंगणवाड्यामध्ये बालकाला दररोज पोषण आहार दिला जातो. इतके सर्व असूनही येथे प्रशिक्षित अंगणवाडी सेविका शिकवत नाहीत. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य खराब होऊ नये. स्पर्धेमध्ये तो मागे राहू नये म्हणून पालक पाल्यांना सरकारी अंगणवाडीमध्ये न पाठविता खासगी शाळेत पाठविणे पसंद करीत आहेत. पूर्वी नर्सरी, केजी या शाळा फक्त शहरापुरत्या मर्यादित होत्या. परंतु कॉन्व्हेंटचे पीक ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. लहान खेड्यापासून १० ते २० किमीचा प्रवास करत पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवत आहेत. यात जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारल्याशिवाय जनतेची मानसिकता बदलणार नाही आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना उतरती कळा लागणार यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)