शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

अंगणवाड्यांना उतरती कळा

By admin | Updated: June 12, 2016 02:13 IST

मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे.

पालकांचा कल नर्सरीकडे : विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटतेयपुसद : मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे. तर दुसरीकडे स्पर्धेच्या युगात आपली पाल्य मागे पडायला नको म्हणून प्रत्येक जण नर्सरीमध्ये दाखल करताना दिसतो. यामुळे तालुक्यातील अंगणवाडींना उतरती कळा लागल्याचे दिसत आहे.बालकांना आरोग्यासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे यासाइी शासनाने गावोगावी अंगणवाड्या सुरू केल्या आहे. परंतु या अंगणवाड्या फक्त बालकांना या खा आणि जा पुरत्याच मर्यादित दिसत आहे. जागरुक पालक आपल्या पाल्यांना अंगणवाडीमध्ये न पाठवता खासगी शाळेमध्ये केजी, नर्सरीसाठी पैसा खर्च करून पाठवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे. शासनाने प्रत्येक गावात अंगणवाडी सुरू केली आहे. या अंगणवाड्यामध्ये बालकाला दररोज पोषण आहार दिला जातो. इतके सर्व असूनही येथे प्रशिक्षित अंगणवाडी सेविका शिकवत नाहीत. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य खराब होऊ नये. स्पर्धेमध्ये तो मागे राहू नये म्हणून पालक पाल्यांना सरकारी अंगणवाडीमध्ये न पाठविता खासगी शाळेत पाठविणे पसंद करीत आहेत. पूर्वी नर्सरी, केजी या शाळा फक्त शहरापुरत्या मर्यादित होत्या. परंतु कॉन्व्हेंटचे पीक ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. लहान खेड्यापासून १० ते २० किमीचा प्रवास करत पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवत आहेत. यात जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारल्याशिवाय जनतेची मानसिकता बदलणार नाही आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना उतरती कळा लागणार यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)