शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:09 IST

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देफवारणीचे २० बळी : कृषी, आरोग्य, महसूलला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. तब्बल चार तास विविध यंत्रणेच्या प्रमुखाकडून या पथकाने माहिती घेतली असून समितीच्या अहवालावरच विषबाधेची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे ही समिती जिल्ह्यात दाखल होताच सर्वांनाच धडकी भरली.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू तर ७०० जणांना विषबाधा झाली. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’चे गठण केले. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, कृषी सहसंचालक डॉ. सुभाष नागरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा समावेश आहे. ही समिती सोमवारी यवतमाळात दाखल झाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात फवारणी बाधेची स्थिती जाणून घेतली.बाजारात कोणत्या प्रकारची कीटकनाशके विकली गेली, नेमके याच वर्षी काय बदल झाला, कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने काय कारवाई केली, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विषबाधा रुग्णांसाठी कोणता प्रोटोकॉल पाळला जातो आणि मृत्यू झालेले आणि बाधित रुग्णांच्या कौटुंबिक स्थितीची सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक विभागाला सूक्ष्म माहिती देण्यास सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, मेडिलकचे डॉ. बाबा येलके, डॉ. घोडेस्वार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.‘मेडिकल’मध्ये विषबाधितांची भेट‘एसआयटी’च्या पथकाने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वार्ड क्र. १८ मध्ये उपचार घेत असलेल्या विषबाधित शेतकरी-शेतमजुरांसोबत संवाद साधला. यावेळी सुनील उकंडे (३२) रा. मनपूर ता. आर्णी, विशाल लक्ष्मण मडावी रा. राजूरवाडी ता. घाटंजी, विजय राठोड रा. ब्रम्हनाथ ता. दारव्हा, हरिभाऊ कुंभेकार रा. भारी ता. यवतमाळ यांच्याशी संवाद साधला. किती दिवसापासून फवारणी करीत आहात, कोणती औषध फवारली, फवारणीचे मिश्रण कुणाच्या सांगण्यावरून केले, किती औषधाचे मिश्रण तयार केले, याची माहिती पथकातील सदस्यांनी घेतली. त्यानंतर अतिदक्षता कक्षात तीन रुग्णांची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार यांनी रुग्णालयातील समस्या पथकापुढे मांडल्या.दारव्हा येथे फवारणी बाधितांशी चर्चादारव्हा : ‘एसआयटी’ पथकाने सोमवारी दारव्हा येथे भेट दिली. प्रत्यक्ष शेतकºयांशी विश्रामगृहावर संवाद साधला. यावेळी तालुक्यातील पाच शेतकºयांना बोलाविण्यात आले होते. तब्बल दोन तास ही बैठक सुरूच होती. यावेळी विजय भाऊराव राठोड (इरथळ), मोहन देविदास हिवराळे (बिजोरा), भारत शंकर साखरकर (अंंतरगाव), विष्णू महादेव गावंडे (घनापूर), भारत उकंडा आडे (शेलोडी) यांच्याशी चर्चा करून विषबाधेची कारणे जाणून घेतली. त्यानंतर तालुक्यातील उचेगावच्या सेवादासनगर येथे रवी राठोड या मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.सर्वांनाच भरली धडकीमुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चे पथक जिल्ह्यात दाखल झाले. ही समिती सूक्ष्म अभ्यास करून फवारणी विषबाधा प्रकरणास जबाबदार असणाºयांवर दोष निश्चित करणार आहे. कृषी विभागावरच या पथकाचा अधिक भर होता. हे प्रकरण इतक्या उशिरा का बाहेर आले, यावरही कृषी यंत्रणेकडे जाब विचारण्यात आला. कीटकनाशकांच्या हाताळणीबाबत कृषी विभाग काय उपक्रम राबवित आहे, याचाही अहवाल मागविला. यामुळे कृषी विभागासोबतच सर्वांनीच या पथकाची धास्ती घेतली आहे.