शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:09 IST

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देफवारणीचे २० बळी : कृषी, आरोग्य, महसूलला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. तब्बल चार तास विविध यंत्रणेच्या प्रमुखाकडून या पथकाने माहिती घेतली असून समितीच्या अहवालावरच विषबाधेची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे ही समिती जिल्ह्यात दाखल होताच सर्वांनाच धडकी भरली.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू तर ७०० जणांना विषबाधा झाली. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’चे गठण केले. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, कृषी सहसंचालक डॉ. सुभाष नागरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा समावेश आहे. ही समिती सोमवारी यवतमाळात दाखल झाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात फवारणी बाधेची स्थिती जाणून घेतली.बाजारात कोणत्या प्रकारची कीटकनाशके विकली गेली, नेमके याच वर्षी काय बदल झाला, कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने काय कारवाई केली, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विषबाधा रुग्णांसाठी कोणता प्रोटोकॉल पाळला जातो आणि मृत्यू झालेले आणि बाधित रुग्णांच्या कौटुंबिक स्थितीची सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक विभागाला सूक्ष्म माहिती देण्यास सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, मेडिलकचे डॉ. बाबा येलके, डॉ. घोडेस्वार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.‘मेडिकल’मध्ये विषबाधितांची भेट‘एसआयटी’च्या पथकाने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वार्ड क्र. १८ मध्ये उपचार घेत असलेल्या विषबाधित शेतकरी-शेतमजुरांसोबत संवाद साधला. यावेळी सुनील उकंडे (३२) रा. मनपूर ता. आर्णी, विशाल लक्ष्मण मडावी रा. राजूरवाडी ता. घाटंजी, विजय राठोड रा. ब्रम्हनाथ ता. दारव्हा, हरिभाऊ कुंभेकार रा. भारी ता. यवतमाळ यांच्याशी संवाद साधला. किती दिवसापासून फवारणी करीत आहात, कोणती औषध फवारली, फवारणीचे मिश्रण कुणाच्या सांगण्यावरून केले, किती औषधाचे मिश्रण तयार केले, याची माहिती पथकातील सदस्यांनी घेतली. त्यानंतर अतिदक्षता कक्षात तीन रुग्णांची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार यांनी रुग्णालयातील समस्या पथकापुढे मांडल्या.दारव्हा येथे फवारणी बाधितांशी चर्चादारव्हा : ‘एसआयटी’ पथकाने सोमवारी दारव्हा येथे भेट दिली. प्रत्यक्ष शेतकºयांशी विश्रामगृहावर संवाद साधला. यावेळी तालुक्यातील पाच शेतकºयांना बोलाविण्यात आले होते. तब्बल दोन तास ही बैठक सुरूच होती. यावेळी विजय भाऊराव राठोड (इरथळ), मोहन देविदास हिवराळे (बिजोरा), भारत शंकर साखरकर (अंंतरगाव), विष्णू महादेव गावंडे (घनापूर), भारत उकंडा आडे (शेलोडी) यांच्याशी चर्चा करून विषबाधेची कारणे जाणून घेतली. त्यानंतर तालुक्यातील उचेगावच्या सेवादासनगर येथे रवी राठोड या मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.सर्वांनाच भरली धडकीमुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चे पथक जिल्ह्यात दाखल झाले. ही समिती सूक्ष्म अभ्यास करून फवारणी विषबाधा प्रकरणास जबाबदार असणाºयांवर दोष निश्चित करणार आहे. कृषी विभागावरच या पथकाचा अधिक भर होता. हे प्रकरण इतक्या उशिरा का बाहेर आले, यावरही कृषी यंत्रणेकडे जाब विचारण्यात आला. कीटकनाशकांच्या हाताळणीबाबत कृषी विभाग काय उपक्रम राबवित आहे, याचाही अहवाल मागविला. यामुळे कृषी विभागासोबतच सर्वांनीच या पथकाची धास्ती घेतली आहे.