शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 29, 2015 02:59 IST

येथे मतदार कमी असल्यामुळे सर्वच प्रभागांत एका-एका मताला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे विजयासाठी उमेदवार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहे.

जेवण व वाहन खर्चाची तयारी : जिंकण्यासाठी सगळेच फंडे वापरू लागले उमेदवारमारेगाव : येथे मतदार कमी असल्यामुळे सर्वच प्रभागांत एका-एका मताला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे विजयासाठी उमेदवार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहे. मताचे गणित जुळविण्यासाठी इतरत्र गेलेल्या मतदारांना मतदानाला येण्याचे निरोप पाठविले जात असून त्यांच्या प्रवास व जेवणाच्या खर्चाची व्यवस्थाही करण्याची हमी दिली जात आहे.येथील नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्याच मनसुब्याने रिंगणात उतरला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आपण कसे विजयी होणार आहोत, याचे सर्वच उमेदवार गणित मांडत आहे. नगरपंचायतीसाठी १७ उमेदवार निवडायचे असले, तरी प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करीत आहे. शहराच्या प्रभाग रचनेत अनेक प्रभागातील मतदार संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी मतदारांत जास्त उमेदवार उभे असल्याने कमी मतात उमेदवार विजयी होणार आहे. कमी मतांचे गणित लक्षात घेता एका-एका मताला आता सोन्याचा भाव आला आहे. एक-एक मत मिळविण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहे. कामधंदा, नोकरी आदी निमित्ताने व बदली करून गेलेल्या स्थलांतरित मतदारांच्या मतदानावर बहुतांश उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नाही, तर जो बाहेर स्थलांतरीत मतदार आणण्यास यशस्वी होईल, तो निश्चितच विजयी होईल, असे चित्र असल्याने स्थलांतरित मतांनाही प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता, जिल्हा व राज्य पातळीवरचे दिग्गज राजकारणी येथे प्रचारासाठी आणले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची निवडणूक जास्त प्रतिष्ठेची असते, हे येथील सर्वसामान्य मतदारांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. आरोप-प्रेत्यारोपाच्या फैरी जोरदारपणे झडत आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाला शहरातून बदलून गेलेले कर्मचारी, तसेच नोकरीनिमित्त व विवाहामुळे बाहेरगावी गेलेले तरूण-तरूणी, शिक्षणासाठी बाहेरगावी असलेले विद्यार्थी, अशा स्थलांतरित मतांचे महत्त्व विजयी होण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. याची कल्पना उमेदवार व पॅनल प्रमुखांना आली आहे. ज्या पॅनल प्रमुखांना शहर व निवडणुकीचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी आता बाहेरगावी असलेला मतदार गोळा करण्याची यंत्रणा कामी लावण्यास सुरूवात केली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. (शहर प्रतिनिधी)