शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 29, 2015 02:59 IST

येथे मतदार कमी असल्यामुळे सर्वच प्रभागांत एका-एका मताला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे विजयासाठी उमेदवार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहे.

जेवण व वाहन खर्चाची तयारी : जिंकण्यासाठी सगळेच फंडे वापरू लागले उमेदवारमारेगाव : येथे मतदार कमी असल्यामुळे सर्वच प्रभागांत एका-एका मताला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे विजयासाठी उमेदवार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहे. मताचे गणित जुळविण्यासाठी इतरत्र गेलेल्या मतदारांना मतदानाला येण्याचे निरोप पाठविले जात असून त्यांच्या प्रवास व जेवणाच्या खर्चाची व्यवस्थाही करण्याची हमी दिली जात आहे.येथील नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्याच मनसुब्याने रिंगणात उतरला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आपण कसे विजयी होणार आहोत, याचे सर्वच उमेदवार गणित मांडत आहे. नगरपंचायतीसाठी १७ उमेदवार निवडायचे असले, तरी प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करीत आहे. शहराच्या प्रभाग रचनेत अनेक प्रभागातील मतदार संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी मतदारांत जास्त उमेदवार उभे असल्याने कमी मतात उमेदवार विजयी होणार आहे. कमी मतांचे गणित लक्षात घेता एका-एका मताला आता सोन्याचा भाव आला आहे. एक-एक मत मिळविण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहे. कामधंदा, नोकरी आदी निमित्ताने व बदली करून गेलेल्या स्थलांतरित मतदारांच्या मतदानावर बहुतांश उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नाही, तर जो बाहेर स्थलांतरीत मतदार आणण्यास यशस्वी होईल, तो निश्चितच विजयी होईल, असे चित्र असल्याने स्थलांतरित मतांनाही प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता, जिल्हा व राज्य पातळीवरचे दिग्गज राजकारणी येथे प्रचारासाठी आणले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची निवडणूक जास्त प्रतिष्ठेची असते, हे येथील सर्वसामान्य मतदारांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. आरोप-प्रेत्यारोपाच्या फैरी जोरदारपणे झडत आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाला शहरातून बदलून गेलेले कर्मचारी, तसेच नोकरीनिमित्त व विवाहामुळे बाहेरगावी गेलेले तरूण-तरूणी, शिक्षणासाठी बाहेरगावी असलेले विद्यार्थी, अशा स्थलांतरित मतांचे महत्त्व विजयी होण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. याची कल्पना उमेदवार व पॅनल प्रमुखांना आली आहे. ज्या पॅनल प्रमुखांना शहर व निवडणुकीचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी आता बाहेरगावी असलेला मतदार गोळा करण्याची यंत्रणा कामी लावण्यास सुरूवात केली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. (शहर प्रतिनिधी)