शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शासन निर्णयानंतरही विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:58 IST

२०२० साठी पीक कर्ज द्यावे व थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी, सदर रक्कमेवर बँकांना प्राप्त होणाऱ्या दिनांकापर्यंत व्याज आकारणी करावी, संबंधित बँकांना निधी व्याजासह देण्यात येईल, असे बँकांना कळविण्यात आले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी सुरु झाली नाही.

ठळक मुद्दे‘आरबीआय’च्या परवानगीसाठी अडले घोडेराज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारने हमीची तयारी दर्शविली. तसा शासन निर्णय निर्गमित केला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तिढा अद्याप कायमच आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्याचा निर्णय २४ डिसेंबर २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत घेतलेले अल्प मुदतीचे पीक कर्ज, पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील ३० सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपयांपर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या १९ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कारवाई सुरू आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मधल्या काळात विदर्भातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता आला नाही. नंतर मार्चमध्ये योजनेची अंमलबजावणी सुरु असताना कोविड-१९ च्या संकटामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. या साथीच्या रोगांमुळे राज्याचे उत्पन्न स्त्रोतही रोडावले. उपलब्ध निधी कोरोनावरील उपाययोजनेसाठी वळविण्यात आला. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य नसल्याचे वित्त विभागाने कळविले. यामुळे पात्र लाभार्थी थकीत राहून नवीन पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला.राज्य शसनाच्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे व थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी, सदर रक्कमेवर बँकांना प्राप्त होणाऱ्या दिनांकापर्यंत व्याज आकारणी करावी, संबंधित बँकांना निधी व्याजासह देण्यात येईल, असे बँकांना कळविण्यात आले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी सुरु झाली नाही. यासाठी बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी लागणार आहे. तशी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कर्जमुक्तीचा तिढा अद्याप कायमच आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री स्वत: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळून तत्काळ पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे.- संजय राठोडपालकमंत्री, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती