शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लेखापालाविनाच होतात कोट्यवधींचे व्यवहार

By admin | Updated: December 24, 2015 03:03 IST

येथील तहसील कार्यालयात लेखापालाविनाच कोट्यवधींचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तहसीलचा कारभार : पैसे वाटपात उडतो नेहमीच गोंधळप्रवीण पिन्नमवार पांढरकवडायेथील तहसील कार्यालयात लेखापालाविनाच कोट्यवधींचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजना पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, शासनाच्या विविध मदत पॅकेजसह शासनाच्या विविध योजना तहसील कार्यालयामार्फत राबविल्या जातात. त्यासाठी दर महिन्यात लाखोंचा, तर वर्षभरात १३ ते १४ कोटींचा व्यवहार केला जातो. सदर व्यवहार सद्यस्थितीत दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांमार्फत कला जात आहे. त्यामुळे या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. इतर शासकीय कार्यालयात अशा प्रकारच्या व्यवहारासाठी लेखापालाची नियुक्ती केली जाते. मात्र येथील तहसील कार्यालयात एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी लेखापाल नसल्याने कोट्यवधी रूपयांचे व्यवहार लेखापालाविनाच करण्यात येत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सदर व्यवहाराचा ताण येत आहे. या व्यवहारात तहसीलचीही कसोटी लागत आहे. सदर प्रकार एकट्या केळापूर तहसील कार्यालयात नसून जिल्ह्यात व राज्यात असाच प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. संजय गांधी निराधार योजनेत दर महिन्याला लाखोंचा व्यवहार होतो. लाभार्थ्याना लाखो रूपयांचे वाटप करण्यात येते. पुरवठा विभागातही लाखो रूपयांचे व्यवहार करण्यात येतात. नैसर्गिक आपत्ती विभागातही अनेकदा लाखोंचे लाभार्थ्याना वाटप करण्यात येते. शासनाच्या पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा मदत निधी देण्याचे कामही तहसील प्रशासनातर्फे कधी-कधी करण्यात येते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदत निधीच्या यादीत कधी नावच नसते, तर कधी ज्यांच्या नावाने धनादेश निघातो, तो शेतकरी मरण पावलेला असतो. योग्य लाभार्थ्यांना मदत पोहोचत नसल्याची ओरडअनेकदा योग्य लाभार्थ्याला मदत पोहोचत नसल्याची ओरड प्रत्येकवेळी होत असते. तथापि जी यंत्रणा हे काम बघते, त्यांच्याकडे पुरेसा शिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याची बाब समोर येते. ज्यांची कुवत नाही, अशा कर्मचाऱ्यांना सदर कामे दिली जातात व यामध्ये गोंधळ निर्माण होतो. दरवर्षी तहसील प्रशासनातर्फे १३ ते १४ कोटींचे व्यवहार होतात आणि तेही लेखापालाविनाच. महसूल प्रशासन इतर विभागाला व्यवहाराबाबत धारेवर धरते. मात्र त्यांच्याच कार्यालयामार्फत होणाऱ्या व्यवहारात सुत्रबद्धता नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.