शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

दारव्हाची टँकर मुक्तीकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नांचे फलित : टंचाईग्रस्त गावांसाठी विविध उपाययोजना

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधीकाळी उन्हाळ्यात तालुक्यातील ४८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. आता त्याच तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.तालुक्यातील २७ गावांत कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू शकते. त्यासाठी पंचायत समितीने विविध उपाययोजना केल्या. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतीअंर्गत ९४ गावे व १३० वस्त्या येतात. यातील एक लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन प्रतिव्यक्ती ४० लीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ६६ नळ योजना, ४६० विहिरी, ४५३ विंधन विहिरींसह इतर माध्यमांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र तोरणाळा, तेलगव्हाण, धामणगाव, करजगाव, कोहळा, सांगवी, राजीवनगर, पिंपळगाव, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, कुºहाड (खु.) निळोणा, राजुरा, जवळा, माहुली, घाटकिन्ही, हनुमाननगर, पाळोदी, भोपापूर, बोरगाव, शेलोडी, किन्हीवळगी, गौळपेंड, तपोना, कंझरा, सांगलवाडी, वागद (बु.) महातोली, खेड, पळशी, खोपडी (खु.), दयार्पूर, वडगाव (गा.), गाजीपूर, वागद (खु.) बोरी, मोरगव्हाण, विडूळ, निंभा, पिंप्री आदी गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.या गावांत उपाययोजना करुनही पाणीसमस्या दूर होत नसल्याने २४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र गेल्यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक संघटना आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून अनेक गावात रोपवाटिका, वृक्षारोपण, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सिमेंट प्लग बंधारे, सीसीटी, सलग समतल चर, धरणातील गाळ उपसणे, माती परीक्षण आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी मोठा जलसाठा निर्माण झाला.पंचायत समितीतर्फे वार्षिक आराखड्याच्या माध्यमातून पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे अनेक गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.२० गावात जून अखेरीस टंचाईची शक्यतातेलगव्हाण, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, मोरगव्हाण, विडूळ, बोरगाव, निंभा, पिंप्री, कुºहाड (खु.), भोपापूर, धामणगाव, करजगाव, राजुरा, कोहळा, निळोणा, सांगलवाडी, खोपडी (खु.), तोरणाळा, वागद (बु.), राजीवनगर, पिंपळगाव आदी गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज नाही. तथापि यातील व इतर काही, अशा २० गावांमध्ये जून अखेरपर्यंत टंचाई निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता तेथे खासगी विहीर अधिग्रहण, चार नळयोजना दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी