शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हाची टँकर मुक्तीकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नांचे फलित : टंचाईग्रस्त गावांसाठी विविध उपाययोजना

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधीकाळी उन्हाळ्यात तालुक्यातील ४८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. आता त्याच तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.तालुक्यातील २७ गावांत कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू शकते. त्यासाठी पंचायत समितीने विविध उपाययोजना केल्या. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतीअंर्गत ९४ गावे व १३० वस्त्या येतात. यातील एक लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन प्रतिव्यक्ती ४० लीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ६६ नळ योजना, ४६० विहिरी, ४५३ विंधन विहिरींसह इतर माध्यमांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र तोरणाळा, तेलगव्हाण, धामणगाव, करजगाव, कोहळा, सांगवी, राजीवनगर, पिंपळगाव, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, कुºहाड (खु.) निळोणा, राजुरा, जवळा, माहुली, घाटकिन्ही, हनुमाननगर, पाळोदी, भोपापूर, बोरगाव, शेलोडी, किन्हीवळगी, गौळपेंड, तपोना, कंझरा, सांगलवाडी, वागद (बु.) महातोली, खेड, पळशी, खोपडी (खु.), दयार्पूर, वडगाव (गा.), गाजीपूर, वागद (खु.) बोरी, मोरगव्हाण, विडूळ, निंभा, पिंप्री आदी गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.या गावांत उपाययोजना करुनही पाणीसमस्या दूर होत नसल्याने २४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र गेल्यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक संघटना आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून अनेक गावात रोपवाटिका, वृक्षारोपण, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सिमेंट प्लग बंधारे, सीसीटी, सलग समतल चर, धरणातील गाळ उपसणे, माती परीक्षण आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी मोठा जलसाठा निर्माण झाला.पंचायत समितीतर्फे वार्षिक आराखड्याच्या माध्यमातून पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे अनेक गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.२० गावात जून अखेरीस टंचाईची शक्यतातेलगव्हाण, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, मोरगव्हाण, विडूळ, बोरगाव, निंभा, पिंप्री, कुºहाड (खु.), भोपापूर, धामणगाव, करजगाव, राजुरा, कोहळा, निळोणा, सांगलवाडी, खोपडी (खु.), तोरणाळा, वागद (बु.), राजीवनगर, पिंपळगाव आदी गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज नाही. तथापि यातील व इतर काही, अशा २० गावांमध्ये जून अखेरपर्यंत टंचाई निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता तेथे खासगी विहीर अधिग्रहण, चार नळयोजना दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी