शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डेंग्यूचे प्रमाण बालकांमध्ये अधिक

By admin | Updated: November 8, 2014 22:45 IST

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून असंख्य रुग्ण आजही विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश तापाची लागण

उमरखेड(कुपटी) : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून असंख्य रुग्ण आजही विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश तापाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा प्रकारचे २० बालक रुग्णालयात सध्या दाखल आहेत.एकीकडे मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण तालुक्यात वाढत असताना या तापावर नियंत्रण मिळविण्यामध्ये आरोग्य यंत्रणा अपुरी पउत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना, जनजागृती आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत नाही. तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा या बाबतीत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील या साथीच्या आजारांचा आणि त्यावर सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत अद्याप आढावा घेतलेला नाही. याचाच परिणाम म्हणून डेंग्यूचा प्रकोप वाढतच आहे. उमरखेड शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसात ऋषिकेश दिवेकर, आकाश भोजरे, सपना सलीम, नलिनी वाहुळे, साधना उगले, दीपाली शिमरे, कृष्णा शिमरे, स्वाती शिनगनकर, अंकिता खंडाळे आणि इतर असे २० लहान मुलांना दाखल करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे ही सर्व मुले ११ वर्षाच्या आतील वयोगटातील आहे. परंतु शासकीय रुग्णालयात या तापावर नियंत्रण मिळण्यासाठी लागणारी औषधी, सलाईन व इतर साधने नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. जे औषधी आहे त्यावरच उपचार सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. डेंग्यूच्या तापाचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. परंतु उमरखेड शासकीय रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधाच रुग्णांसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. उमरखेडसह ढाणकी, मुळावा आदी ठिकाणच्या खासगी रुग्णलयांमध्येसुद्धा बाल रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांची सर्रास लूट सुरू असल्याचेसुद्धा दिसून येत आहे. काही ठिकाणी साधा ताप जरी असला तरीसुद्धा रुग्णांना डेंग्यूची लक्षणे असल्याचे सांगून घाबरून देण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्यसेवकांच्या भरवशावर उपचार घ्यावे लागत आहेत. ज्यांना शक्य आहे असे रुग्ण यवतमाळ, नांदेड व इतर ठिकाणी उपचारार्थ जात आहेत. परंतु गोरगरीब रुग्णांना तालुक्यातीलच शासकीय आरोग्य सेवेवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नाही. (वार्ताहर)