शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

खचलेल्या विहिरी जाचक अटीत

By admin | Updated: March 6, 2015 02:11 IST

अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र लाभासाठी २०१२ च्या सर्वेक्षणाचा आधार घेण्याची अट घातली.

यवतमाळ : अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र लाभासाठी २०१२ च्या सर्वेक्षणाचा आधार घेण्याची अट घातली. परिणामी जिल्ह्यात खचलेल्या एक हजार ८०९ विहिरींपैकी केवळ १४१ विहिरींच्या कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या जाचक अटीमुळे खचलेल्या विहीर अनुदानाचा बट्ट्याबोळ होण्याची चिन्हे आहेत.यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सिंचन वाढीसाठी सिंचन विहीर खोदण्यासाठी शासनाने अनुदान दिले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी खोदल्या. मात्र २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आता शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे. विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला दीड लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. खचलेली विहीर दुरुस्त होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अनुदानासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना आता जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. २०१२-१३ मध्ये अतिवृष्टीने खचलेल्या, बुजलेल्या विहीर दुरुस्तीसाठी त्यावेळी झालेले सर्वेक्षण आणि पंचनाम्याचा आधार घेऊन अनुदान दिले जाणार आहे. मात्र त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणाबाबत शेतकऱ्यांची ओरड होती. त्यामुळेच जिल्ह्यातील एक हजार ८०९ खचलेल्या सिंचन विहिरींपैकी केवळ १४१ विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरात मिळाली आहे. २०१२-१३ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे काम कृषी सहायक, तलाठी, ग्रामसचिव यांनी गावपातळीवर केले. त्यावेळी शेत खरडी, घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, रस्ते, नाले, पूल यांचे नुकसान यावरच सर्वेत भर देण्यात आला होता. दुर्दैवाने विहीर ही शेवटच्या टप्प्यात होती. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य सर्वेक्षणच झाले नाही. त्यावर शेतकऱ्यांनी सातत्याने आक्षेपही घेतले. आता त्याच गोलमाल सर्वेच्या आधारावर विहीर बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. अशा स्थितीत काही राजकीय पुढाऱ्यांनीही आपल्या अधिकारांचा वापर करून यंत्रणेला दबावात आणले आहे. काही तालुक्यांमध्ये खचलेल्या विहिरींची संख्याही अधिक दिसून येते. प्रत्यक्षात पावसाची सरासरी आणि पूरबाधित क्षेत्राचा विचार केल्यास या तालुक्यांमधील अचानक खचलेल्या विहिरींची वाढलेली संख्या संशय निर्माण करणारे आहे. यामागे केवळ राजकीय दबाव कारणीभूत असल्याचेही सखोल चौकशीत बाहेर येण्याची शक्यता आहे. सत्तेत आलो म्हणून आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले अनेक शेतकऱ्यांना नेमका शासन आदेश काय आहे याचीच माहिती नाही. मात्र मदत मिळणार या आशेपोटी दीड लाखांच्या मदतीकरिता अनेकांनी पंचायत लोकमतविशेषसमितीकडे प्रस्ताव दिले आहे. यातूनच दारव्हा तालुक्यात ८५४, दिग्रसमध्ये १६८, नेर १३७ अशी आकडेवारी आहे. या उलट प्रशासकीय मंजुरी फक्त नेर तालुक्यातील सात विहिरींनाच मिळाली आहे. अशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आला आहे. या तफावतीवरून योजनेतील पोलखोल होते. (कार्यालय प्रतिनिधी)