शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यामुळे शेतीला धोका

By admin | Updated: July 2, 2014 23:28 IST

नाल्याचे पाणी अडून शेती पिकाला वापरता यावे, शिवाय जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने ठाणेगाव येथे बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या

पारवा : नाल्याचे पाणी अडून शेती पिकाला वापरता यावे, शिवाय जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने ठाणेगाव येथे बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या जंगलातील हा बंधारा निकृष्ट कामामुळे किती दिवस टिकेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे. कृषी विभागाने निर्माण केलेला या बंधाऱ्यासाठी गिट्टी, रेती आदी साहित्य अतिशय हलक्या दर्जाचे वापरले आहे. सिमेंटचे प्रमाणही कमी सदर बंधारा निर्माण करताना नाल्यातील मौल्यवान सागवान वृक्षाच्या अस्तित्वाविषयीसुद्धा विचार केला गेला नाही. या कामांची चौकशी करून कारवाईची मागणी आहे. या नाल्यामध्ये सागवानाची मोठमोठी वृक्ष आहेत. बंधाऱ्यात पाणी अडल्यानंतर ती कोसळून पडणार आहे. या प्रकारात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. या बाबीचा विचार बंधारा बांधताना केला गेला नाही. बंधाऱ्याची उंचीही केवळ तीन ते साडेतीन फूट असल्याने नेमका पाण्याचा किती साठा होईल, हा प्रश्नही याठिकाणी निर्माण झाला आहे. गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या या कामाच्या बांधकामावर पाण्याचा अत्यल्प वापर करण्यात आला. बंधाऱ्याची निर्मिती करताना संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी कधीही लक्ष दिलेले नाही. काम झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराने या विभागाला सूचना दिली. संपूर्ण बांधकाम होईपर्यंत अधिकारी याठिकाणी दाखल झाले नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावत गेले. या कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)