शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चिंचमंडळ-महादापेठ रस्त्याची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:03 IST

तालुक्यातील चिंचमंडळ ते कोथुर्ला-महादापेठ या ग्रामीण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची संपूर्ण दबाई केलेली गीट्टी निघाली असून या रस्त्यावरून वाहने,.....

ऑनलाईन लोकमतमारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ ते कोथुर्ला-महादापेठ या ग्रामीण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची संपूर्ण दबाई केलेली गीट्टी निघाली असून या रस्त्यावरून वाहने, तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गेल्या १५ वर्षात रस्ता दुरूस्तीच्या नावावर लाखोची उधळण केली. काही भागात डांबरीकरण केले. झालेल्या निकृष्ट कामाने या रस्त्यावर डांबराचा टिपूसही दिसून येत नाही. २००४ मध्ये माजी आमदार वामनराव कासावार यांनी खनिज विकास निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण मंजुर केले होते. त्या भूमिपूजनाचा फलक चिंचमंडळ येथे अद्यापही जनतेला रस्ता दुरूस्तीच्या वाकुल्या दाखवित आहे. पण या रस्त्याबाबत बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. आता हाच रस्ता मुख्यमंत्री सडक योजना निधीतून मजबुतीकरण, डांबरीकरण होणार असल्याचे पुढारी, जि.प.चे अभियंते छातीठोकपणे सांगत आहे. मात्र मार्च महिना संपत आला तरी या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही.