शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:50 IST

मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता.

ठळक मुद्देगुंजचा रहिवासी : मुलाची आत्महत्या नसून खून झाल्याचा पित्याचा आरोप

गुंज : मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाने आत्महत्या केली नसून त्याचा खून केल्याचा आरोप वडीलांनी केला आहे. महागाव तालुक्यात एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.शैलेष नरसिंग चव्हाण (२१) रा. गुंज असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मुंबई येथील रचना संसद आर्किटेक्ट प्रभादेवी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत होता. तो सायन परिसरात मित्रासोबत भाड्याची रुम घेऊन राहात होता. त्याचे खोलीवरील सहकारी बाहेरगावी गेल्याने तो एकटाच होता. गुरुवार २८ डिसेंबर रोजी खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे घरमालकाने खिडकीतून बघितले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मुंबई गाठली.शैलेशच्या दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आढळून आल्या. तसेच खोलीचे दारही बाहेरून बंद असल्याचे वडीलांना सांगितले. त्यावरून शैलशने आत्महत्या केली नसून त्याचा कुणी तरी घातपात केल्याची तक्रार वडील नरसिंग चव्हाण यांनी सायन पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मुंबईहून गुंज येथे आणण्यात आला. दुपारी २ वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.दुसरी घटनामहागाव तालुक्यातील महानगरात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सवना येथील डॉ. विद्या विठ्ठलराव करोडकर (२४) हिने पुणे येथे गळफास लाऊन आत्महत्या केली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच महागाव तालुक्यातील गुंज येथील शैलेश नरसिंग चव्हाण या विद्यार्थ्याने मुंबई येथे आत्महत्या केली. दोघांच्या मृत्युने महागाव तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे.