शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वन्यप्राण्यांमुळे २० कोटींवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले.

ठळक मुद्देचार वर्षातील आकडेवारी : वनविभागाने शेतकऱ्यांना अदा केली नुकसान भरपाई

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर व रोह्यांची संख्या आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात या दोनही प्राण्यांचा कायम धुडगूस असून गेल्या चार वर्षात या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान केले आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके या वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत केली आहे.वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले. सन २०१६-१७ मध्ये चार लाख नऊ हजार ९५० रूपयांचे नुकसान झाले. सन २०१७-१८ मध्ये २० कोटी १६ लाख ४६ हजार, २०१८-१९ मध्ये सहा लाख ५६ हजार ४१, तर सन २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ६७ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. चार वर्षात असे एकूण २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान झाले.पूर्वी जंगलांमध्ये वन्यप्राणी होते. या वन्यप्राण्यांच्या शिकारीही मोठ्या प्रमाणावर केल्या जायच्या. परंतु पुढे वनविभागाच्या कठोर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी शिकारीवर बंधने आलीत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने कठोर पाऊल उचलले. यातून वन्यप्राण्यांची संख्याही वाढत गेली. वनसंवर्धनासाठी वन्यजीवांचा साखळी संतुलीत राहावी, यासाठी प्रयत्न होत असले तरी रोही, रानडुकरांसारख्या प्राण्यांची झालेली वाढ मात्र शेतकºयांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली.गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांनी शेतशिवारात प्रचंड धुमाकूळ चालविला. शेतात पीक वाढले की, रोही, रानडुक्कर हे वन्यप्राणी कळपाने शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहे. त्यातून शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र ज्या प्रमाणात नुकसान होते, त्या प्रमाणात भरपाई मिळत नाही.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध क्लृप्त्यावन्यजीवांच्या धुमाकूळामुळे पिकांचे नुकसान होत आहे. असे असले तरी या प्राण्यांना कायद्यानुसार ठार मारता येत नाही. त्यामुळे शेतकरी या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध युक्त्या वापरत आहे. अनेक ठिकाणी रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण केल्याचे दिसून येते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग