शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

वन्यप्राण्यांमुळे २० कोटींवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले.

ठळक मुद्देचार वर्षातील आकडेवारी : वनविभागाने शेतकऱ्यांना अदा केली नुकसान भरपाई

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर व रोह्यांची संख्या आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात या दोनही प्राण्यांचा कायम धुडगूस असून गेल्या चार वर्षात या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान केले आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके या वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत केली आहे.वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले. सन २०१६-१७ मध्ये चार लाख नऊ हजार ९५० रूपयांचे नुकसान झाले. सन २०१७-१८ मध्ये २० कोटी १६ लाख ४६ हजार, २०१८-१९ मध्ये सहा लाख ५६ हजार ४१, तर सन २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ६७ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. चार वर्षात असे एकूण २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान झाले.पूर्वी जंगलांमध्ये वन्यप्राणी होते. या वन्यप्राण्यांच्या शिकारीही मोठ्या प्रमाणावर केल्या जायच्या. परंतु पुढे वनविभागाच्या कठोर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी शिकारीवर बंधने आलीत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने कठोर पाऊल उचलले. यातून वन्यप्राण्यांची संख्याही वाढत गेली. वनसंवर्धनासाठी वन्यजीवांचा साखळी संतुलीत राहावी, यासाठी प्रयत्न होत असले तरी रोही, रानडुकरांसारख्या प्राण्यांची झालेली वाढ मात्र शेतकºयांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली.गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांनी शेतशिवारात प्रचंड धुमाकूळ चालविला. शेतात पीक वाढले की, रोही, रानडुक्कर हे वन्यप्राणी कळपाने शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहे. त्यातून शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र ज्या प्रमाणात नुकसान होते, त्या प्रमाणात भरपाई मिळत नाही.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध क्लृप्त्यावन्यजीवांच्या धुमाकूळामुळे पिकांचे नुकसान होत आहे. असे असले तरी या प्राण्यांना कायद्यानुसार ठार मारता येत नाही. त्यामुळे शेतकरी या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध युक्त्या वापरत आहे. अनेक ठिकाणी रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण केल्याचे दिसून येते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग