शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे वाढले, तज्ज्ञांची वाणवा

By admin | Updated: August 27, 2014 23:54 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची

काशीनाथ लाहोरे - यवतमाळमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची वाणवा आहे. पर्यायाने सायबर क्राईमशी संबंधित तक्रार आल्यास शक्यतोवर ती दाखल होणार नाही, असाच प्रयत्न होताना दिसतो. समाजात सायबर क्राईमचे अनेक प्रकार घडतात. मात्र बोटावर मोजण्याऐवढ्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात. आंतरराष्ट्रीय नियमाने २००० साली सायबर लॉचा कायद्यात समावेश करण्यात आला असून २००७-०८ पासून वकिलांच्या शिक्षणात सायबर लॉचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या गुन्ह्यांचे आणि त्यांच्या विविधतेचे प्रकार पाहिले की उच्च शिक्षणाची आवश्यकता भासते. विधीज्ञांना पदव्युत्तर सायबर लॉचे शिक्षण देणारी पदविका महाविद्यालये पुणे मुंबईत आहेत. परंतु पदव्युत्तर पदवी देणारी दोनच विद्यापीठे महाराष्ट्रात असून ती दोनही विदर्भात आहेत हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याच विद्यापीठातून विधी पदवीनंतर मास्टर आॅफ सायबर लॉ अ‍ॅन्ड इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त करण्याची सोय आहे. पोलीस खात्यांमध्ये देखील सायबर लॉबाबत फारशी जागृती नसल्याने त्यांनाही खासगी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आज भारतात ४५०० सायबर तज्ज्ञांची गरज असताना जेमतेम ७०० सायबर तज्ज्ञ आहेत. परिणामी गुन्ह्यांची व्यवस्थित नोंद होणे, न्यायालयात शिक्षा होण्याची प्रमाणे पाहिजे तेवढे नाही. तरुण वकिलांनी सायबर लॉमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली तर भविष्यात मोठी संधी मिळणार आहे.