शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

सायबर गुन्हे वाढले, तज्ज्ञांची वाणवा

By admin | Updated: August 27, 2014 23:54 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची

काशीनाथ लाहोरे - यवतमाळमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची वाणवा आहे. पर्यायाने सायबर क्राईमशी संबंधित तक्रार आल्यास शक्यतोवर ती दाखल होणार नाही, असाच प्रयत्न होताना दिसतो. समाजात सायबर क्राईमचे अनेक प्रकार घडतात. मात्र बोटावर मोजण्याऐवढ्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात. आंतरराष्ट्रीय नियमाने २००० साली सायबर लॉचा कायद्यात समावेश करण्यात आला असून २००७-०८ पासून वकिलांच्या शिक्षणात सायबर लॉचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या गुन्ह्यांचे आणि त्यांच्या विविधतेचे प्रकार पाहिले की उच्च शिक्षणाची आवश्यकता भासते. विधीज्ञांना पदव्युत्तर सायबर लॉचे शिक्षण देणारी पदविका महाविद्यालये पुणे मुंबईत आहेत. परंतु पदव्युत्तर पदवी देणारी दोनच विद्यापीठे महाराष्ट्रात असून ती दोनही विदर्भात आहेत हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याच विद्यापीठातून विधी पदवीनंतर मास्टर आॅफ सायबर लॉ अ‍ॅन्ड इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त करण्याची सोय आहे. पोलीस खात्यांमध्ये देखील सायबर लॉबाबत फारशी जागृती नसल्याने त्यांनाही खासगी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आज भारतात ४५०० सायबर तज्ज्ञांची गरज असताना जेमतेम ७०० सायबर तज्ज्ञ आहेत. परिणामी गुन्ह्यांची व्यवस्थित नोंद होणे, न्यायालयात शिक्षा होण्याची प्रमाणे पाहिजे तेवढे नाही. तरुण वकिलांनी सायबर लॉमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली तर भविष्यात मोठी संधी मिळणार आहे.