शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे वाढले, तज्ज्ञांची वाणवा

By admin | Updated: August 27, 2014 23:54 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची

काशीनाथ लाहोरे - यवतमाळमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची वाणवा आहे. पर्यायाने सायबर क्राईमशी संबंधित तक्रार आल्यास शक्यतोवर ती दाखल होणार नाही, असाच प्रयत्न होताना दिसतो. समाजात सायबर क्राईमचे अनेक प्रकार घडतात. मात्र बोटावर मोजण्याऐवढ्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात. आंतरराष्ट्रीय नियमाने २००० साली सायबर लॉचा कायद्यात समावेश करण्यात आला असून २००७-०८ पासून वकिलांच्या शिक्षणात सायबर लॉचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या गुन्ह्यांचे आणि त्यांच्या विविधतेचे प्रकार पाहिले की उच्च शिक्षणाची आवश्यकता भासते. विधीज्ञांना पदव्युत्तर सायबर लॉचे शिक्षण देणारी पदविका महाविद्यालये पुणे मुंबईत आहेत. परंतु पदव्युत्तर पदवी देणारी दोनच विद्यापीठे महाराष्ट्रात असून ती दोनही विदर्भात आहेत हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याच विद्यापीठातून विधी पदवीनंतर मास्टर आॅफ सायबर लॉ अ‍ॅन्ड इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त करण्याची सोय आहे. पोलीस खात्यांमध्ये देखील सायबर लॉबाबत फारशी जागृती नसल्याने त्यांनाही खासगी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आज भारतात ४५०० सायबर तज्ज्ञांची गरज असताना जेमतेम ७०० सायबर तज्ज्ञ आहेत. परिणामी गुन्ह्यांची व्यवस्थित नोंद होणे, न्यायालयात शिक्षा होण्याची प्रमाणे पाहिजे तेवढे नाही. तरुण वकिलांनी सायबर लॉमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली तर भविष्यात मोठी संधी मिळणार आहे.