शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

पश्चिमालाप कार्यक्रमातून संस्कृतिदर्शन

By admin | Updated: March 10, 2016 03:14 IST

स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्यावतीने येथील यशवंत स्टेडियमवर सोमवारी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रम घेण्यात आला.

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : गोवा, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील कलावंतांचा सहभागपुसद : स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्यावतीने येथील यशवंत स्टेडियमवर सोमवारी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रम घेण्यात आला. यातून विविध संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील कलावंतांनी सादर केलेल्या कलेने श्रोत्यांना थक्क करून सोडले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार डॉ.संजय गरकल, ठाणेदार अनिल कुरडकर, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, उपसभापती विवेक मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, बी.जी. राठोड, रवींद्र महल्ले, जैनूल सिद्दीकी, मदन बडगुजर, आशा चव्हाण, माधुरी आसेगावकर, विस्तार अधिकारी प्रकाश घोडेकर आदी उपस्थित होते. पश्चिमालाप कार्यक्रमाची सुरुवात सांगली येथील कलावंतांनी गणपती वंदनाने केली. त्यानंतर शाहीर अनंतकुमार सोळंके यांनी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करून प्रेक्षकांमध्ये स्फूर्ती जागविली. बळीराजामधील नैराश्य दूर व्हावे, त्यांना स्फूर्ती मिळावी व त्यांचे मनोधैर्य उंचवावे, या हेतूने सादर केलेल्या पोवाड्यातून बळीराजाला उभारी मिळण्यास मदत झाली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय न घेता परिस्थितीशी दोन हात करा, असा संदेश या पोवाड्यातून देण्यात आला. गोवा येथील कलावंतांनी समई नृत्य सादर केले. यामध्ये चार ते पाच किलो वजन असलेल्या पितळी समई डोक्यावर घेवून शरीराचे संतुलन साधत त्यांनी गीत सादर केले. राजस्थान येथील हिरानाथ कालबेलिया व समूहाने चेरी नृत्य एकाग्रता व संतुलन ठेवून सादर केले. हे नृत्य पाहताना प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला. श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटासह या नृत्याला दाद दिली. त्यानंतर राजस्थानी कलावंतांनी भवाई नृत्य सादर केले. खऱ्या अर्थाने रंगत आणली ती लावणी नृत्याने. महाराष्ट्राची लोककला असलेल्या या लावणी नृत्यावर प्रेक्षक आपोआपच थिरकायला लागले. एकंदरीत बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रमातून भारतीय संस्कृती व सामाजिक परंपरेचे दर्शन प्रेक्षकांना झाले. तसेच शेतकऱ्यांना यातून सकारात्मक संदेश देण्याचेही काम करण्यात आले. (प्रतिनिधी)