शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पश्चिमालाप कार्यक्रमातून संस्कृतिदर्शन

By admin | Updated: March 10, 2016 03:14 IST

स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्यावतीने येथील यशवंत स्टेडियमवर सोमवारी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रम घेण्यात आला.

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : गोवा, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील कलावंतांचा सहभागपुसद : स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्यावतीने येथील यशवंत स्टेडियमवर सोमवारी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रम घेण्यात आला. यातून विविध संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील कलावंतांनी सादर केलेल्या कलेने श्रोत्यांना थक्क करून सोडले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार डॉ.संजय गरकल, ठाणेदार अनिल कुरडकर, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, उपसभापती विवेक मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, बी.जी. राठोड, रवींद्र महल्ले, जैनूल सिद्दीकी, मदन बडगुजर, आशा चव्हाण, माधुरी आसेगावकर, विस्तार अधिकारी प्रकाश घोडेकर आदी उपस्थित होते. पश्चिमालाप कार्यक्रमाची सुरुवात सांगली येथील कलावंतांनी गणपती वंदनाने केली. त्यानंतर शाहीर अनंतकुमार सोळंके यांनी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करून प्रेक्षकांमध्ये स्फूर्ती जागविली. बळीराजामधील नैराश्य दूर व्हावे, त्यांना स्फूर्ती मिळावी व त्यांचे मनोधैर्य उंचवावे, या हेतूने सादर केलेल्या पोवाड्यातून बळीराजाला उभारी मिळण्यास मदत झाली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय न घेता परिस्थितीशी दोन हात करा, असा संदेश या पोवाड्यातून देण्यात आला. गोवा येथील कलावंतांनी समई नृत्य सादर केले. यामध्ये चार ते पाच किलो वजन असलेल्या पितळी समई डोक्यावर घेवून शरीराचे संतुलन साधत त्यांनी गीत सादर केले. राजस्थान येथील हिरानाथ कालबेलिया व समूहाने चेरी नृत्य एकाग्रता व संतुलन ठेवून सादर केले. हे नृत्य पाहताना प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला. श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटासह या नृत्याला दाद दिली. त्यानंतर राजस्थानी कलावंतांनी भवाई नृत्य सादर केले. खऱ्या अर्थाने रंगत आणली ती लावणी नृत्याने. महाराष्ट्राची लोककला असलेल्या या लावणी नृत्यावर प्रेक्षक आपोआपच थिरकायला लागले. एकंदरीत बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रमातून भारतीय संस्कृती व सामाजिक परंपरेचे दर्शन प्रेक्षकांना झाले. तसेच शेतकऱ्यांना यातून सकारात्मक संदेश देण्याचेही काम करण्यात आले. (प्रतिनिधी)